अ‍ॅपशहर

'६ पोलीस ठार, दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला'

‘दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलेला हल्ला हे त्यांच्या भ्याडपणाचे लक्षण आहे,’ अशी टीका संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. ‘दहशतवाद्यांना अचबल येथे सहा पोलिसांना ठार केले, हे भ्याड कृत्य आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हुतात्म्यांना सलाम,’ असे ट्विट जेटलींनी केले आहे.

Maharashtra Times 18 Jun 2017, 1:22 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम killing of 6 cops by terrorists in anantnag an act of cowardice jaitley
'६ पोलीस ठार, दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला'


‘दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलेला हल्ला हे त्यांच्या भ्याडपणाचे लक्षण आहे,’ अशी टीका संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. ‘दहशतवाद्यांना अचबल येथे सहा पोलिसांना ठार केले, हे भ्याड कृत्य आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हुतात्म्यांना सलाम,’ असे ट्विट जेटलींनी केले आहे.

काश्मीरमध्ये सध्या असलेल्या परिस्थितीशी झुंजताना ‘मानवी ढाल’ करणे हा अपवाद असून तो नियम होऊ शकत नाही,’ असे स्पष्टीकरण लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिले आहे. मेजर लीतुल गोगोई यांनी काश्मीरमध्ये एका आंदोलकाला लष्करी वाहनाला बांधून त्याचा वापर ‘मानवी ढाल’ म्हणून केल्याच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तेलंगणमधील दुंडीगल येथे हवाई दल अकादमीच्या संचनलासाठी रावत उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी काश्मीरमधील लष्कराच्या भूमिकेविषयी प्रश्नांना उत्तरे दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज