नवी दिल्ली:
निवडणुकीच्या निकालाआधी आणि शेवटचा टप्पा संपताच माध्यमांमध्ये विविध एजन्सींनी केलेली एक्झिट पोल्सची निरीक्षणं बाहेर येतात. यामुळे निकालापूर्वीच देशाचा मूड जाणून घेण्यास मदत मिळते. प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत या एक्झिट पोल्सच्या निकालावर चर्चा झडतात आणि सत्तेची गणितं मांडली जातात. पण एक्झिट पोल्सचे अंदाज नेहमीच बरोबर ठरतात असे नव्हे.
एक्झिट पोल्सचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. एक्झिट पोल निवडणूक निकालांचं एक मोठं चित्र मांडतात, पण प्रत्यक्ष निकालांपासून हे चित्र पूर्ण वेगळंही असू शकतं.
मागील वेळी बहुतांश एक्झिट पोल्सचे अंदाज खरे
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी बहुतांश एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बनवेल, असे एक्झिट पोलचे अंदाज होते. निकालांनंतर भाजपला बहुमत मिळालं एनडीएला ३३६ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला अवघ्या ४४ जागांवर समाधान मानावे लागले.
१९९८ मधील लोकसभा निवडणुकांआधी आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्सने अंदाजही खरे ठरले होते. एनडीएला २०० हून अधिक जागा, काँग्रेसला २०० हून कमी जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
२०१४ ला एक्झिट पोल्सचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ च्या लोकसभा एक्झिट पोलची सर्वाधिक चर्चा झाली. बहुतांश एक्झिट पोल्सनी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी भविष्यवाणी २००४ मध्ये केली होती. पण प्रत्यक्ष निकाल याच्या अगदी उलट आले. एनडीएला १८९ जागा तर यूपीएला २२२ जागा मिळाल्या.
२००९ च्या लोकसभेच्या वेळीही एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले. काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील हा अंदाज एकाही पोलमध्ये व्यक्त करण्यात आला नव्हता. निकाल लागले तेव्हा एकट्या काँग्रेसला २०६ जागा आणि युपीएला २६२ जागा मिळाल्या.
निवडणुकीच्या निकालाआधी आणि शेवटचा टप्पा संपताच माध्यमांमध्ये विविध एजन्सींनी केलेली एक्झिट पोल्सची निरीक्षणं बाहेर येतात. यामुळे निकालापूर्वीच देशाचा मूड जाणून घेण्यास मदत मिळते. प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत या एक्झिट पोल्सच्या निकालावर चर्चा झडतात आणि सत्तेची गणितं मांडली जातात. पण एक्झिट पोल्सचे अंदाज नेहमीच बरोबर ठरतात असे नव्हे.
एक्झिट पोल्सचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. एक्झिट पोल निवडणूक निकालांचं एक मोठं चित्र मांडतात, पण प्रत्यक्ष निकालांपासून हे चित्र पूर्ण वेगळंही असू शकतं.
मागील वेळी बहुतांश एक्झिट पोल्सचे अंदाज खरे
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी बहुतांश एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बनवेल, असे एक्झिट पोलचे अंदाज होते. निकालांनंतर भाजपला बहुमत मिळालं एनडीएला ३३६ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला अवघ्या ४४ जागांवर समाधान मानावे लागले.
१९९८ मधील लोकसभा निवडणुकांआधी आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्सने अंदाजही खरे ठरले होते. एनडीएला २०० हून अधिक जागा, काँग्रेसला २०० हून कमी जागांचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
२०१४ ला एक्झिट पोल्सचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ च्या लोकसभा एक्झिट पोलची सर्वाधिक चर्चा झाली. बहुतांश एक्झिट पोल्सनी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर येईल अशी भविष्यवाणी २००४ मध्ये केली होती. पण प्रत्यक्ष निकाल याच्या अगदी उलट आले. एनडीएला १८९ जागा तर यूपीएला २२२ जागा मिळाल्या.
२००९ च्या लोकसभेच्या वेळीही एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले. काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील हा अंदाज एकाही पोलमध्ये व्यक्त करण्यात आला नव्हता. निकाल लागले तेव्हा एकट्या काँग्रेसला २०६ जागा आणि युपीएला २६२ जागा मिळाल्या.