कोलकाता :
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने पश्चिम बंगालमध्ये आज( शुक्रवार)पासून काढण्यात येणाऱ्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी परवागनी नाकारली. तत्पूर्वी, धार्मिक आणि जातीय तणावाचा मुद्दा पुढे करून रथयात्रेला परवानगी नाकारल्याची माहिती पश्चिम बंगाल सरकारने न्यायालयाला दिली. दरम्यान, एक न्यायमूर्तींच्या या निर्णयाला भाजपने लगेचच मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठात आव्हान दिले. मात्र त्यावर लगेच सुनावणी न घेता, आज, शुक्रवारी सकाळी याचिका करण्याची सूचना खंडपीठाने केली. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यभरात शुक्रवारपासून रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती. राज्याच्या तीन भागातून सात, नऊ आणि डिसेंबरला भाजपतर्फे रथयात्रा काढण्यात येणार होती. 'लोकशाही बचाव यात्रा' असे नाव या रथयात्रेला देण्यात आले आहे. राज्यातील ४२ मतदारसंघांना रथयात्रेद्वारे भेट देण्याचा भाजपचा मानस होता.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने नऊ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली असून, रथयात्रेबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांनी २१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्या. तापव्रता चक्रवर्ती (Tapabrata) यांनी हे आदेश दिले. या वेळी राज्य महाधिवक्ता किशोर दत्त यांनी न्यायालयाला सांगितले, की कूचबिहार जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी रथयात्रेला परवानगी नाकारली आहे. कूचबिहारी जिल्ह्याला धार्मिक तेढ आणि जातीय दंगलींचा इतिहास असून, हा भाग संवेदनशील आहे.
यावर 'काही विपरीत घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल,' अशी विचारणा न्यायालयाने भाजपला केली. त्यावर 'पक्षाची रॅली पूर्णत: शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे. मात्र, कायदा-सुव्यवस्था जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे,' असे भाजपचे वकील अनिंद्य मित्र यांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने परवानगी नाकारली. मात्र, मुख्य न्यायाधीशांकडे परवानगीसाठी दाद मागणार असल्याचे भाजपच्या वतीने कळविण्यात आले असून, मुख्य न्यायाधीशांनी आज, (शुक्रवार) सकाळी याचिका सादर करण्यास सांगितले आहे.
---
''तृणमूल' विरोधकांचा आवाज दाबत आहे'
रथयात्रेला परवानगी नाकारून, सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी गुरुवारी केला. 'भाजपचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आम्ही न्यायालयाच्या परवानगीची वाट बघू,' असेही घोष म्हणाले. 'आमच्या अनुभवानुसार परवानगी मिळणार नाही, याची आम्हाला कल्पना होती. यासाठी आम्ही महिन्याभरापूर्वीच पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्या वेळी त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि आता ऐनवेळी ते परवानगी नाकारात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचा तृणमूल कॉंग्रेसला कोणताही घटनात्मक अधिकार नाही,' असेही घोष म्हणाले.
------
घोष यांच्या गाडीवर हल्ला
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी कूचबिहारी जिल्ह्यातील सितलकूची (Sitalkuchi) भागात घडली आहे. घोष त्यांच्या गाडीने कूचबिहारी जिल्ह्यातील मठभंगा (Mathabhanga) गावाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. दरम्यान, हल्लेखोर तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे घोष यांनी सांगितले आहे. 'तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ते आम्हाला माघारी जाण्यास सांगत होते. या हल्ल्यात आमचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत,' असे घोष यांनी सांगितले असून, हल्ला झाला त्या वेळी पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते, असा आरोपदेखील घोष यांनी केला आहे. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी भाजपच्या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचे सांगितले असून, हा हल्ला भाजपला अंतर्मुख करणारा आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने पश्चिम बंगालमध्ये आज( शुक्रवार)पासून काढण्यात येणाऱ्या रथयात्रेला कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी परवागनी नाकारली. तत्पूर्वी, धार्मिक आणि जातीय तणावाचा मुद्दा पुढे करून रथयात्रेला परवानगी नाकारल्याची माहिती पश्चिम बंगाल सरकारने न्यायालयाला दिली. दरम्यान, एक न्यायमूर्तींच्या या निर्णयाला भाजपने लगेचच मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठात आव्हान दिले. मात्र त्यावर लगेच सुनावणी न घेता, आज, शुक्रवारी सकाळी याचिका करण्याची सूचना खंडपीठाने केली. त्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यभरात शुक्रवारपासून रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती. राज्याच्या तीन भागातून सात, नऊ आणि डिसेंबरला भाजपतर्फे रथयात्रा काढण्यात येणार होती. 'लोकशाही बचाव यात्रा' असे नाव या रथयात्रेला देण्यात आले आहे. राज्यातील ४२ मतदारसंघांना रथयात्रेद्वारे भेट देण्याचा भाजपचा मानस होता.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने नऊ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली असून, रथयात्रेबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांनी २१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. न्या. तापव्रता चक्रवर्ती (Tapabrata) यांनी हे आदेश दिले. या वेळी राज्य महाधिवक्ता किशोर दत्त यांनी न्यायालयाला सांगितले, की कूचबिहार जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी रथयात्रेला परवानगी नाकारली आहे. कूचबिहारी जिल्ह्याला धार्मिक तेढ आणि जातीय दंगलींचा इतिहास असून, हा भाग संवेदनशील आहे.
यावर 'काही विपरीत घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल,' अशी विचारणा न्यायालयाने भाजपला केली. त्यावर 'पक्षाची रॅली पूर्णत: शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे. मात्र, कायदा-सुव्यवस्था जपण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे,' असे भाजपचे वकील अनिंद्य मित्र यांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने परवानगी नाकारली. मात्र, मुख्य न्यायाधीशांकडे परवानगीसाठी दाद मागणार असल्याचे भाजपच्या वतीने कळविण्यात आले असून, मुख्य न्यायाधीशांनी आज, (शुक्रवार) सकाळी याचिका सादर करण्यास सांगितले आहे.
---
''तृणमूल' विरोधकांचा आवाज दाबत आहे'
रथयात्रेला परवानगी नाकारून, सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी गुरुवारी केला. 'भाजपचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आम्ही न्यायालयाच्या परवानगीची वाट बघू,' असेही घोष म्हणाले. 'आमच्या अनुभवानुसार परवानगी मिळणार नाही, याची आम्हाला कल्पना होती. यासाठी आम्ही महिन्याभरापूर्वीच पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्या वेळी त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि आता ऐनवेळी ते परवानगी नाकारात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचा तृणमूल कॉंग्रेसला कोणताही घटनात्मक अधिकार नाही,' असेही घोष म्हणाले.
------
घोष यांच्या गाडीवर हल्ला
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी कूचबिहारी जिल्ह्यातील सितलकूची (Sitalkuchi) भागात घडली आहे. घोष त्यांच्या गाडीने कूचबिहारी जिल्ह्यातील मठभंगा (Mathabhanga) गावाच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. दरम्यान, हल्लेखोर तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे घोष यांनी सांगितले आहे. 'तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ते आम्हाला माघारी जाण्यास सांगत होते. या हल्ल्यात आमचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत,' असे घोष यांनी सांगितले असून, हल्ला झाला त्या वेळी पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते, असा आरोपदेखील घोष यांनी केला आहे. दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी भाजपच्या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचे सांगितले असून, हा हल्ला भाजपला अंतर्मुख करणारा आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.