म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कृष्णा नदीच्या पाणीवाटपावरून तेलंगणची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६६६ टीएमसी पाण्यावर शिक्कामोर्तब केले.
कृष्णा नदीच्या पाण्याचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांमध्ये प्रकल्पनिहाय पुनर्वाटप करण्याची मागणी करणारी तेलंगणची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. यापूर्वी कृष्णा पाणी लवादानेही आंध्र-तेलंगणची ही मागणी फेटाळून लावली होती. लवादाच्या निर्णयाला तेलंगणने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आंध्र प्रदेश राज्यनिर्मिती कायद्यानुसार तेलंगण आणि आंध्र प्रदेशने त्यांच्या वाट्याचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
कृष्णा नदीच्या पाणीवाटपावरून तेलंगणची याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या ६६६ टीएमसी पाण्यावर शिक्कामोर्तब केले.
कृष्णा नदीच्या पाण्याचे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांमध्ये प्रकल्पनिहाय पुनर्वाटप करण्याची मागणी करणारी तेलंगणची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. यापूर्वी कृष्णा पाणी लवादानेही आंध्र-तेलंगणची ही मागणी फेटाळून लावली होती. लवादाच्या निर्णयाला तेलंगणने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आंध्र प्रदेश राज्यनिर्मिती कायद्यानुसार तेलंगण आणि आंध्र प्रदेशने त्यांच्या वाट्याचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घ्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.