अ‍ॅपशहर

१८ वर्षांनंतर भारत-पाक आमने-सामने

कुलभूषण जाधव खटल्याच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान १८ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस) आमने-सामने उभे ठाकले आहेत. यावेळी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत तर १८ वर्षांपूर्वी पाकिस्तान भारताविरुद्ध या न्यायालयात गेला होता.

Maharashtra Times 14 May 2017, 6:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kulbhushan jadhav case india pakistan at icj after 18 years
१८ वर्षांनंतर भारत-पाक आमने-सामने


कुलभूषण जाधव खटल्याच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान १८ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस) आमने-सामने उभे ठाकले आहेत. यावेळी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत तर १८ वर्षांपूर्वी पाकिस्तान भारताविरुद्ध या न्यायालयात गेला होता.

पाक नौदलाच्या ताफ्यातील एक विमान पाडण्यात आल्याने पाकने भारताविरुद्ध आंतराष्ट्रीय न्यायालयात जाऊन याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे त्या प्रकरणात यशस्वी ठरलेल्या भारताला कुलभूषण जाधव प्रकरणीही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.

हॉलंडमधील हेग येथे पीस पॅलेसमधील ग्रेट हॉल ऑफ जस्टिस येथे याप्रकरणी सुनावणी होणार आहे. जाधव यांच्याबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षांची बाजू येथे ऐकून घेतली जाईल. भारताने ८ मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करून जाधव प्रकरणी न्याय मागितला आहे.

जाधव यांच्याशी संपर्क व्हावा म्हणून भारताने पाकिस्तानकडे १६ विनंती अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले आहे. जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्हिसासाठी केलेल्या अर्जावरही पाकने कोणताच प्रतिसाद दिलेला नाही, असे भारताचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज