तिरुमला:
नवरात्रीच्या ब्रह्मोत्सवात तिरुपती बालाजीच्या मंदिरात तब्बल १४,००० लाडूंची अफरातफर झाल्याचं वृ्त्त समोर आलं आहे. या सर्व गायब लाडूंचा शोध सुरू असून मंदिराची चौकशी समिती विक्रेत्यांची चौकशी करत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांसाठी लाडवाचा प्रसाद विक्रीला ठेवण्यात आला होता. १०० रुपयाचे आणि ५० रुपयाचे कुपन ही देण्यात येत होते. हे कुपन विक्रेते भाविकांकडून घेऊ त्याबदल्यात लाडू देत होते. पण काही विक्रेत्यांनी बरेच कुपनचे झेरॉक्स काढून लाडू लंपास केले. आणि मंदिराबाहेर दुप्पट किमतीत विकले. या घोळाची माहिती कोणीतरी मंदिर समितीला दिली. त्यानंतर मंदिर समितीने चौकशी केली असता तब्बल १४,००० लाडवांची अफरातफर झाल्याचे समजले. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
नवरात्रीच्या ब्रह्मोत्सवात तिरुपती बालाजीच्या मंदिरात तब्बल १४,००० लाडूंची अफरातफर झाल्याचं वृ्त्त समोर आलं आहे. या सर्व गायब लाडूंचा शोध सुरू असून मंदिराची चौकशी समिती विक्रेत्यांची चौकशी करत आहे.
नवरात्रीच्या निमित्ताने भक्तांसाठी लाडवाचा प्रसाद विक्रीला ठेवण्यात आला होता. १०० रुपयाचे आणि ५० रुपयाचे कुपन ही देण्यात येत होते. हे कुपन विक्रेते भाविकांकडून घेऊ त्याबदल्यात लाडू देत होते. पण काही विक्रेत्यांनी बरेच कुपनचे झेरॉक्स काढून लाडू लंपास केले. आणि मंदिराबाहेर दुप्पट किमतीत विकले. या घोळाची माहिती कोणीतरी मंदिर समितीला दिली. त्यानंतर मंदिर समितीने चौकशी केली असता तब्बल १४,००० लाडवांची अफरातफर झाल्याचे समजले. याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.