मटा ऑनलाइन वृत्त । पाटणा
केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कामगिरीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आपल्या खास शैलीत ट्विटरवरून टीका केली. तीन वर्षात फक्त चाय-गाय, दंगा-गंगा याशिवाय सरकारने केले तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मागील काही काळापासून लालू प्रसाद यादव सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने सरकार आणि भाजप तीन वर्षात कामं केल्याचा दावा करत आहे तर, विरोधक सरकारच्या कामगिरीवर टीका करत आहेत. लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळावर प्रतिक्रिया देताना लालूंनी टीका केली. तीन वर्षात 'चाय-गाय', दंगा-गंगा, फीता-गीता, भ्रम-धर्म, तीन तलाक-तीन दलाल हीच सरकारची कामगिरी असल्याचे लालू यांनी म्हंटले.
केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कामगिरीवर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आपल्या खास शैलीत ट्विटरवरून टीका केली. तीन वर्षात फक्त चाय-गाय, दंगा-गंगा याशिवाय सरकारने केले तरी काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मागील काही काळापासून लालू प्रसाद यादव सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने सरकार आणि भाजप तीन वर्षात कामं केल्याचा दावा करत आहे तर, विरोधक सरकारच्या कामगिरीवर टीका करत आहेत. लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या कार्यकाळावर प्रतिक्रिया देताना लालूंनी टीका केली. तीन वर्षात 'चाय-गाय', दंगा-गंगा, फीता-गीता, भ्रम-धर्म, तीन तलाक-तीन दलाल हीच सरकारची कामगिरी असल्याचे लालू यांनी म्हंटले.