पाटणा : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बिहार आणि झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा सुपडा साफ झाला. त्यामुळे नाराज झालेल्या लालूप्रसाद यादव यांनी दोन दिवस अन्नत्याग केला होता. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जेवण सोडणाऱ्या लालूप्रसादांनी थेट रविवारीच जेवण घेतले, अशी माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिली आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे सध्या रांची येथील राजेंद्र प्रसाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांच्यावर रक्तदाब, मधुमेह आणि किडनीच्या विकारांवर उपचार सुरू आहेत.
लालूंचा दोन दिवस अन्नत्याग
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बिहार आणि झारखंडमध्ये राष्ट्रीय जनता दलाचा सुपडा साफ झाला...
MT 28 May 2019, 4:00 am