अ‍ॅपशहर

संरक्षणमंत्र्याने काय सीमेवर राहावे?

‘मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री आहेत म्हणजे त्यांनी २४ तास सीमेवरच राहिले पाहिजे आणि गोव्यात कधीही येऊ नये असे नाही,’ अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काँग्रेसला फटकारले आहे. ‘संरक्षणमंत्री पर्रीकर कायम वारंवार गोव्यात येतात.

Maharashtra Times 21 Sep 2016, 1:57 am
पणजीः ‘मनोहर पर्रीकर हे संरक्षणमंत्री आहेत म्हणजे त्यांनी २४ तास सीमेवरच राहिले पाहिजे आणि गोव्यात कधीही येऊ नये असे नाही,’ अशा शब्दात गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काँग्रेसला फटकारले आहे. ‘संरक्षणमंत्री पर्रीकर कायम वारंवार गोव्यात येतात. ते ‘पार्ट-टाइम संरक्षणमंत्री आहेत,’ या काँग्रेसच्या टीकेला पार्सेकर यांनी चोख शब्दात उत्तर दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम laxmikant parsekar defends manohar parrikars frequent visits to goa
संरक्षणमंत्र्याने काय सीमेवर राहावे?


‘गोव्यामध्ये भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू केली आहे. मोठ्या योजनांना प्रारंभ केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात गोळा आला असून, ते भाजप आणि पर्रीकर यांच्याविरोधात अशा प्रकारे सवंग प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत,’ असा आरोप पार्सेकर यांनी केला.

‘पाच वर्षांमध्ये समाज कल्याण योजना लोकप्रिय झाली आहे. काँग्रेसने त्यांच्या काळात किती योजना जाहीर केला आणि किती लोकप्रिय झाल्या याचा विचार करावा आणि मग आरोप करावेत,’ असे आव्हान पार्सेकर यांनी दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज