नवी दिल्ली:
'डेटा लीक, आधार लीक, एसएससी पेपर लीक, सीबीएसई पेपर लीक... अशा सगळ्या प्रकरणांचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'प्रत्येक गोष्ट 'लीक' आहे, कारण देशाचा चौकीदार 'वीक' (अकार्यक्षम) आहे,' असा टोला राहुल यांनी मोदींना हाणलाय.
'सीबीएसई परीक्षेतील दोन विषयांचा पेपर फुटल्यामुळं बोर्डानं फेरपरीक्षेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचं वातावरण असून विद्यार्थी जंतरमंतर येथे विरोध प्रदर्शन करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अत्यंत मोजक्या शब्दांत ट्विट करून मोदींना लक्ष्य केलं. 'किती लीक? प्रत्येक गोष्ट लीक होतेय. 'डेटा'पासून 'डेट'पर्यंत सगळं लीक होतंय. देशाचा चौकीदार 'वीक' (अकार्यक्षम) असल्यानंच हे सगळं होतंय,' असं राहुल यांनी म्हटलंय. या ट्विटसोबत त्यांनी '#बसएकऔरसाल' असं हॅशटॅगही दिलंय.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून राहुल गांधी फॉर्मात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर ते सतत उपरोधिक टीका करतात. 'लीक' प्रकरणांचा आधार घेत त्यांनी पुन्हा एकदा ही संधी साधली आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणवून घेतात. त्याचाच आधार घेत राहुल यांनी ही मार्मिक टिप्पणी केलीय.
'डेटा लीक, आधार लीक, एसएससी पेपर लीक, सीबीएसई पेपर लीक... अशा सगळ्या प्रकरणांचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'प्रत्येक गोष्ट 'लीक' आहे, कारण देशाचा चौकीदार 'वीक' (अकार्यक्षम) आहे,' असा टोला राहुल यांनी मोदींना हाणलाय.
'सीबीएसई परीक्षेतील दोन विषयांचा पेपर फुटल्यामुळं बोर्डानं फेरपरीक्षेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचं वातावरण असून विद्यार्थी जंतरमंतर येथे विरोध प्रदर्शन करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अत्यंत मोजक्या शब्दांत ट्विट करून मोदींना लक्ष्य केलं. 'किती लीक? प्रत्येक गोष्ट लीक होतेय. 'डेटा'पासून 'डेट'पर्यंत सगळं लीक होतंय. देशाचा चौकीदार 'वीक' (अकार्यक्षम) असल्यानंच हे सगळं होतंय,' असं राहुल यांनी म्हटलंय. या ट्विटसोबत त्यांनी '#बसएकऔरसाल' असं हॅशटॅगही दिलंय.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून राहुल गांधी फॉर्मात आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यावर ते सतत उपरोधिक टीका करतात. 'लीक' प्रकरणांचा आधार घेत त्यांनी पुन्हा एकदा ही संधी साधली आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणवून घेतात. त्याचाच आधार घेत राहुल यांनी ही मार्मिक टिप्पणी केलीय.