नवी दिल्ली : श्रमिकांच्या हालअपेष्टांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेण्यापूर्वीच मुंबई व दिल्लीतील २० नामांकित वकिलांनी या प्रश्नाकडे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे लक्ष वेधले होते. 'सध्या मानवतेवर कोसळलेल्या संकटाविषयी सर्वोच्च न्यायालयाने अलिप्त राहून आणि सरकारच्या म्हणण्यावर विसंबून राहून मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले तर सर्वोच्च न्यायालयाने आपले घटनात्मक कर्तव्य सोडून दिल्यासारखे होईल. त्यामुळे यात तात्काळ सुधारणा होणे गरजेचे आहे', असे आवाहन वकिलांच्या या गटाने एका पत्राद्वारे सरन्यायाधीशांना केले होते. या वकिलांमध्ये पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, आनंद ग्रोव्हर, इंदिरा जयसिंग, पर्शांत भूषण, मिहिर देसाई यांचा समावेश आहे.
वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र
श्रमिकांच्या हालअपेष्टांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेण्यापूर्वीच मुंबई व दिल्लीतील २० नामांकित वकिलांनी या प्रश्नाकडे सरन्यायाधीश शरद ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2020, 4:00 am