अ‍ॅपशहर

'या' गावातल्या लोकांना ना मोदी ठाऊक ना राहुल!

संपूर्ण भारतात निवडणुकीचे वारे वाहताहेत. पण मध्य प्रदेशात असंही एक गाव आहे जिथे अजून राजकारण पोहोचलेलं नाही. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येऊन प्रचार केला आहे, पण या गावातले लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांना ठाऊकच नाही कोण मोदी आणि कोण राहुल गांधी.

Dalip Singh | THE ECONOMIC TIMES 18 May 2019, 4:42 pm
रतलाम:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ratlam


संपूर्ण भारतात निवडणुकीचे वारे वाहताहेत. पण मध्य प्रदेशात असंही एक गाव आहे जिथे अजून राजकारण पोहोचलेलं नाही. या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी येऊन प्रचार केला आहे, पण या गावातले लोक त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांना ठाऊकच नाही कोण मोदी आणि कोण राहुल गांधी.

हे गाव आहे रतलाम लोकसभा मतदारसंघातलं वनक्षेत्र कट्टीवाडा येथील दबचा गाव. या गावाला झबुआ नावानंही ओळखतात. खूप उपेक्षित असं हे आदिवासी गाव आहे. पुरेशा सोयी-सुविधा येथे पोहोचलेल्या नाहीत. सोशल मीडिया खूपच दूर राहिलं, पण पारंपरिक प्रकारातल्या रॅली, नुक्कड सभा अशा कोणत्याच माध्यमातून येथे प्रचार पोहोचलेला नाही. गावात केवळ ८०च्या आसपास घरं आहेत, ज्यात ३००-४०० लोक राहतात.

संरपंचच सर्वकाही

गावातले सरपंचच या लोकांच्या मागण्या पूर्ण करतात. त्यामुळे सरपंचच त्यांच्यासाठी सर्वकाही आहेत. मध्य प्रदेशातल्या मालवा क्षेत्रातल्या रतलाम आणि सात अन्य लोकसभा मतदारसंघांसाठी रविवारी मतदान होत आहे.
लेखकाबद्दल
Dalip Singh

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज