नवी दिल्लीः भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर जनर ऑफ मिलिट्री ऑपरेशन्समध्ये (DGMO) सोमवारी फोनवर चर्चा झाली. एका फोन कॉलमुळे दोन्ही देशांतील सीमेवरील तणाव निवळण्याची चिन्ह आहेत. शस्त्रसंधीच्या करारचं ( ceasefire pacts ) पालन करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये सीमेवरील वाढत्या गोळीबाराच्या ( loc ceasefire violation ) घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या या सहमतीने सीमवर्ती भागातील नागरिकांमध्ये नव्या आशा जागृत झाल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये २००३ मध्ये शस्त्रसंधीचा करार करण्यात आला होता. २०१६ पर्यंत या कराराचं पालन केलं गेलं. यानंतर उरीमध्ये दहतवादी हल्ला झाला. २०१६ पासून ते २०१८ दरम्यान मोठ्या प्रमाणात सीमेवर गोळीबार होऊन पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं.
२०१८ मध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारताने तो फेटाळून लावण्यात आला. यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर कित्येकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या घटना घडला. त्यातून दोन्ही देशांकडून नियंत्रण रेषाच्या ( loc) जवळ तोफा आणि मशीनगनचा वापर झाला. यादरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हॉटलाईनवरून संवाद सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. नियमितपणे मेजर रँकच्या अधिकाऱ्याची दुसऱ्या पक्षाशी संवाद व्हायचा. तर आठवड्यातून एकदा ब्रिगेडियर स्तरावर चर्चा होते. पण डीजीएमओ स्तरावर अतिशय कमी वेळा अशी चर्चा झाली. यावेळी सोमवारी दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली आणि बुधवारी मध्यरात्रीपासून शस्त्रसंधी लागू झाली. दोन्ही देशांकडून यासंबंधी संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं आणि शस्त्रसंधीची घोषणा केली गेली.
सीमेवर शांततेत अडथळा आणू शकतील आणि हिंसाचाराला कारणीभूत ठरू शकतील अशा महत्त्वाच्या चिंता दूर करण्यावर डीजीएमोने सहमती दर्शविली. दोन्ही देशांनी २४-२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियंत्रण रेषेवर आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये शस्त्रसंधीच्या कराराचे काटेकोरपणे पालन करण्यास सहमती दर्शवली आहे. कोणत्याही अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी किंवा गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाईन संपर्क आणि 'फ्लॅग मीटिंग'ची व्यवस्थेचा उपयोग केला जाईल, असं संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे ११ हजार वेळा शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना घडल्या असून यामध्ये सुरक्षा दलाचे १४० हून अधिक जवान आणि नागरिक गमावले आहेत.
pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, 'दलालांमुळे शेतकऱ्याची...'
पाकिस्तानने गेल्या वर्षी ५१३३ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. यात सुरक्षा दलातील ४६ जवान शहीद झाले होते. तर यावर्षी २८ जानेवारीपर्यंत शस्त्रसंधीचे २९९ वेळा उल्लंघन झालं आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या महिन्यात संसदेत सांगितलं.
फेटे घातले आणि डीजे लावल्याच्या रागातून दलिताच्या वरातीवर दगडफेक
२०१८ मध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारताने तो फेटाळून लावण्यात आला. यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर कित्येकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या घटना घडला. त्यातून दोन्ही देशांकडून नियंत्रण रेषाच्या ( loc) जवळ तोफा आणि मशीनगनचा वापर झाला. यादरम्यान, दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हॉटलाईनवरून संवाद सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. नियमितपणे मेजर रँकच्या अधिकाऱ्याची दुसऱ्या पक्षाशी संवाद व्हायचा. तर आठवड्यातून एकदा ब्रिगेडियर स्तरावर चर्चा होते. पण डीजीएमओ स्तरावर अतिशय कमी वेळा अशी चर्चा झाली. यावेळी सोमवारी दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली आणि बुधवारी मध्यरात्रीपासून शस्त्रसंधी लागू झाली. दोन्ही देशांकडून यासंबंधी संयुक्त निवेदन जारी करण्यात आलं आणि शस्त्रसंधीची घोषणा केली गेली.
सीमेवर शांततेत अडथळा आणू शकतील आणि हिंसाचाराला कारणीभूत ठरू शकतील अशा महत्त्वाच्या चिंता दूर करण्यावर डीजीएमोने सहमती दर्शविली. दोन्ही देशांनी २४-२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियंत्रण रेषेवर आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये शस्त्रसंधीच्या कराराचे काटेकोरपणे पालन करण्यास सहमती दर्शवली आहे. कोणत्याही अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी किंवा गैरसमज दूर करण्यासाठी हॉटलाईन संपर्क आणि 'फ्लॅग मीटिंग'ची व्यवस्थेचा उपयोग केला जाईल, असं संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे ११ हजार वेळा शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना घडल्या असून यामध्ये सुरक्षा दलाचे १४० हून अधिक जवान आणि नागरिक गमावले आहेत.
pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, 'दलालांमुळे शेतकऱ्याची...'
पाकिस्तानने गेल्या वर्षी ५१३३ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. यात सुरक्षा दलातील ४६ जवान शहीद झाले होते. तर यावर्षी २८ जानेवारीपर्यंत शस्त्रसंधीचे २९९ वेळा उल्लंघन झालं आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या महिन्यात संसदेत सांगितलं.
फेटे घातले आणि डीजे लावल्याच्या रागातून दलिताच्या वरातीवर दगडफेक