नवी दिल्ली: करोनाच्या उद्रेकामुळे विविध राज्यांमध्ये अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि यात्रेकरूसाठी आनंदाची बातमी... अडकलेल्या सर्व नागरिकांना आपापल्या घरी जाता यावे यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यास परवानगी दिल्या नंतर रेल्वेने एकूण ६ विशेष ट्रेन सोडल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाला आणखी काही राज्यांनी संपर्क साधल्यानंतर आता पुढील आठवड्यात नियमितपणे काही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या पूर्वी केंद्र सरकारने अडकलेल्या लोकांना आपपाल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी बसचा वापर करण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे आता बसच्या तुलनेत अडकलेले मजूर आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने आणि तेही कमी वेळेत आपल्या घरी पोहोचणार आहेत. तेलंगणमधील लिंगमपल्ली येथून पहिली विशेष ट्रेन सोडल्यानंतर काही तासांनी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुधारित गाइटलाइन्स जारी केल्या. त्याद्वारे अडकलेल्या लोकांना सोडण्यासाठी अधिक विशेष ट्रेन सोडण्याची परवानगी देण्यात आली.
पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही विशेष ट्रेन वेळोवेळी सोडल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. जेव्हा ते ते राज्य सरकार आम्हाला विशेष ट्रेन सोडण्याची विनंती करेल, तेव्हा आम्ही विशेष ट्रेन सोडू. काही राज्ये आमच्या विभागीय कार्यालयांशी बोलत असून नियमांच्या अधिन राहून आम्ही अधिक विशेष ट्रेन सोडण्यास तयार आहोत, असे अधिकारी म्हणाला.
शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या सर्व विशेष ट्रेन या २४ डब्याच्या होत्या. त्यांची क्षमता १००० ते १२०० प्रवासी वाहून नेण्याची आहे. स्लीपर कोचमध्ये ७२ प्रवाशांऐवजी आता ५४ प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी म्हणाला.
या पूर्वी केंद्र सरकारने अडकलेल्या लोकांना आपपाल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी बसचा वापर करण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र, विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे आता बसच्या तुलनेत अडकलेले मजूर आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने आणि तेही कमी वेळेत आपल्या घरी पोहोचणार आहेत. तेलंगणमधील लिंगमपल्ली येथून पहिली विशेष ट्रेन सोडल्यानंतर काही तासांनी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुधारित गाइटलाइन्स जारी केल्या. त्याद्वारे अडकलेल्या लोकांना सोडण्यासाठी अधिक विशेष ट्रेन सोडण्याची परवानगी देण्यात आली.
पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही विशेष ट्रेन वेळोवेळी सोडल्या जातील अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. जेव्हा ते ते राज्य सरकार आम्हाला विशेष ट्रेन सोडण्याची विनंती करेल, तेव्हा आम्ही विशेष ट्रेन सोडू. काही राज्ये आमच्या विभागीय कार्यालयांशी बोलत असून नियमांच्या अधिन राहून आम्ही अधिक विशेष ट्रेन सोडण्यास तयार आहोत, असे अधिकारी म्हणाला.
शुक्रवारी सुरू करण्यात आलेल्या सर्व विशेष ट्रेन या २४ डब्याच्या होत्या. त्यांची क्षमता १००० ते १२०० प्रवासी वाहून नेण्याची आहे. स्लीपर कोचमध्ये ७२ प्रवाशांऐवजी आता ५४ प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकारी म्हणाला.