अ‍ॅपशहर

मोदींना नीच बोलणं योग्य; मणिशंकर पुन्हा वादात

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 'मोदी नीच आणि असभ्य माणूस' असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी आपण केलेले वक्तव्य योग्यच होतं, असं त्यांनी एका लेखाद्वारे स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2019, 10:42 am
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manishankar


काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 'मोदी नीच आणि असभ्य माणूस' असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी आपण केलेले वक्तव्य योग्यच होतं, असं त्यांनी एका लेखाद्वारे स्पष्ट केलं आहे.

मणिशंकर अय्यर यांनी २०१७मध्ये माध्यमांशी बोलताना 'मोदी नीच आणि असभ्य माणूस' असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेससह अन्य सर्व राजकीय पक्षांनी टीका केली होती. अय्यर यांनीही या विधानाबद्दल माफी मागितली होती. मात्र, अलीकडेच लिहिलेल्या एका लेखात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांचा हवाला देत '२०१७मध्ये मोदींना मी काय म्हणालो होतो ते आठवतंय का? मी केलेली भविष्यवाणी खरी नव्हती का?' असा उल्लेख केला आहे.

मोदींनी प्रचार सभा आणि मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख अय्यर यांनी या लेखात केला आहे. मोदींच्या 'प्लास्टिक सर्जरी' आणि प्राचीन विमानांबद्दलच्या वक्तव्यांना अय्यर यांनी अज्ञानाने भरलेले दावे म्हटलं आहे. तसंच बालाकोट हवाई हल्ल्यावेळी ढगाळ वातावरण, पावसामुळं आपली विमानं पाकिस्तानी रडारपासून वाचू शकतात, या मोदींच्या वक्तव्याचा खरपूस समाचारही घेतला आहे. याशिवाय आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर राजीव गांधींनी टॅक्सीसारखा केला, या मोदींच्या विधानावरही त्यांनी टीका केली. २०१७मध्ये मोदींबद्दल मी काय म्हणालो होतो, ते आठवतंय का? मी खरी भविष्यवाणी केली नव्हती काय? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज