अ‍ॅपशहर

जीभ घसरली...शत्रुघ्न सिन्हांची सारवासारव

आपल्या भाषणात जिनांचं नाव घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आता या प्रकरणी सारवासारव केली आहे. 'माझी जीभ घसरल्याने मी जिनांचं नाव घेतलं मला खरं तर मौलाना आझाद यांचं नाव घ्यायचं होतं,' असं सिन्हा यांनी सांगितलं. भाजपातून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. मोहम्मद अली जिना यांनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान दिलं आहे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2019, 3:47 pm
छिंदवाडा:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shatrughna


आपल्या भाषणात जिनांचं नाव घेतल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आता या प्रकरणी सारवासारव केली आहे. 'माझी जीभ घसरल्याने मी जिनांचं नाव घेतलं मला खरं तर मौलाना आझाद यांचं नाव घ्यायचं होतं,' असं सिन्हा यांनी सांगितलं. भाजपातून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील प्रचारसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. मोहम्मद अली जिना यांनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान दिलं आहे, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं.

सौसर या गावात झालेल्या या सभेत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'काँग्रेस परिवारात महात्मा गांधींपासून सरदार वल्लभभाई पटेलपर्यंत, मोहम्मद अली जिनांपासून जवाहरलाल नेहरूंपर्यंत इंदिरा गांधींपासून राजीव गांधी, राहुल गांधींपर्यंत देशाच्या योगदानात वाटा आहे. देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं हे योगदान असल्यामुळेच काँग्रेसमध्ये आलो.'

'काँग्रेसमध्ये आलोय ते पहिलं आणि शेवटचं. इथून मागे फिरणार नाही,' असंही ते म्हणाले.



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज