अ‍ॅपशहर

लव्ह जिहाद: वधु-वरास पोलिसांनी केली अटक, दोघेही मुस्लिम असल्याचे सिद्ध झाले आणि...

लव्ह जिहादचा संशय आल्याने झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विवाह करू पाहणाऱ्या एका जोडप्याला अटक केली आणि रात्रभर चौकशी केली. त्यानंतर चौकशीत ते दोघेही मुस्लिम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Dec 2020, 4:08 pm
लखनऊ: उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे पोलिसांनी एका मुस्लिम जोडप्याला (Muslim Couple) विवाहस्थळावरून पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्यांना रात्रभर बसवून ठेवले. पोलिसांनी रात्रभर दोघांचीही चौकशी केली. त्यानंतर दोघेही मुस्लिम असल्याचे त्यांनी पुरावे सादर केल्यानंतरच दोघांचे लग्न होऊ शकले. पोलिसांनी लव्ह जिहादअंतर्गत (Love Jihad) लग्न होत असल्याची तक्राल मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. (up police stopped the marriage of a muslim couple)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम वधु-वरास पोलिसांनी अटक केली, दोघेही मुस्लिम असल्याचे सिद्ध झाले आणि...


आम्ही दोघांच्याही मानवाधिकाराचे उल्लंघन केलेले नाही, असे हा निकाह रोखल्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आम्ही कोणताही कायदा तोडलेला नसून फक्त राज्याच्या नव्या बेकायदेशीर धर्मांतर कायद्यांतर्गत एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी कारवाई केली असे पोलिसांनी म्हटले आहे.

मंगळवारी संध्याकाळी राज्याची राजधानी लखनऊ येथून ३२५ किमी अंतरावर असलेल्या कुशीनगर येथे पोलिसांनी ३९ वर्षीय एक पुरुष आणि २८ वर्षीय एका महिलेला (दोन्ही मुस्लिम) विवाह करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे कथित स्वरुपात त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा- सरकारकडून मुलीला विवाहात १० ग्रॅम सोन्याची भेट, कसा मिळवाल लाभ...

या घटनेबाबत अधिक माहिती देताना कुशीनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख विनोदकुमार सिंह यांनी सांगितले की, एका महिलेचा गावात बळजबरीने विवाह लावण्यात येत आहे आणि ती महिला हिंदू आणि तर दुसरा पक्ष मुस्लिम आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी दाखल झालो आणि दोघांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले. चौकशीत आम्हाला समजले की महिला आझमगडची असून ती मुस्लिम आहे आणि पुरुष तिच्याशी विवाह करत होता. संपूर्ण चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबांशी संपर्क साधला आणि त्यांना त्यांच्या हवाली केले. या महिलेबाबत ती हरवल्याची तक्रार या आधी दाखल करण्यात आली होती.

क्लिक करा आणि वाचा- फोटोफीचर: नव्या संसद भवनाची पायाभरणी, मोदींनी केले भूमिपूजन
क्लिक करा आणि वाचा- 'रावसाहेब दानवे यांनी देशातील शेतकऱ्यांचा अपमान केला आहे'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज