जयपूर/ भोपाळ: देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर होत ( coronavirus india ) चालली आहे. यामुळे बहुतेक राज्यांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तर काही राज्यांनी लॉकडाउन घोषित केला आहे. राजस्थानमध्येही १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात करण्यात आले आहेत. यानुसार विनाकारण फिरणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केलं जाईल. तसंच इतर अनेक आवश्यक निर्बंध घालण्यात आले आहेत. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी लॉकडाउनचं समर्थन करत देशव्यापी लॉकडाउनची ( national lockdown ) मागणी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशव्यापी लॉकडाउनच्या मागणीचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समर्थन केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा आहे. देशाला लवकरच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थिती योग्य योजना आखून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होऊ शकते, असं अशोक गहलतो म्हणाले.
मुख्यमंत्री गहलोत यांनी ट्वीटमधून राजस्थानमध्ये संपूर्ण लॉकडाउनचे संकेत दिल्याचं जाणकारांचं मत आहे. राजस्थानमध्ये एक-दोन दिवसांत लॉकडाउन घोषित होण्याची शकता आहे.
india coronavirus : 'करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर आई-वडील काय करतील?', सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
मध्य प्रदेशात १५ मेपर्यंत लॉकडाउन घोषित
दरम्यान, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मध्य प्रदेशात लॉकडाउन घोषित करण्यात ( madhya pradesh lockdown ) आला आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणा आणण्यासाठी १५ मेपर्यंत सर्व काही बंद ठेवावे लागेल, असं सांगत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लॉकडाउनची घोषणा केली.
राज्यातील पॉझिटिव्हिटी दर हा १८ टक्क्यांवर असताना राज्य खुलं ठेवता येणार नाही, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
vaccination : 'राज्यांनो संवेदनशील व्हा, लसीकरणाचा वेग कमी होऊ देऊ नका'
केरळमध्येही लॉकडाउन घोषित
केरळ सरकारने ही करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाउन ( kerala lockdown ) घोषित केला आहे. केरळमध्ये ८ ते १६ मे दरम्यान संपूर्ण लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशव्यापी लॉकडाउनच्या मागणीचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समर्थन केले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात ऑक्सिजन, औषधं आणि इतर साहित्यांचा मोठा तुटवडा आहे. देशाला लवकरच डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. अशा स्थिती योग्य योजना आखून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होऊ शकते, असं अशोक गहलतो म्हणाले.
मुख्यमंत्री गहलोत यांनी ट्वीटमधून राजस्थानमध्ये संपूर्ण लॉकडाउनचे संकेत दिल्याचं जाणकारांचं मत आहे. राजस्थानमध्ये एक-दोन दिवसांत लॉकडाउन घोषित होण्याची शकता आहे.
india coronavirus : 'करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग झाला तर आई-वडील काय करतील?', सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
मध्य प्रदेशात १५ मेपर्यंत लॉकडाउन घोषित
दरम्यान, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मध्य प्रदेशात लॉकडाउन घोषित करण्यात ( madhya pradesh lockdown ) आला आहे. एएनआयने हे वृत्त दिलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणा आणण्यासाठी १५ मेपर्यंत सर्व काही बंद ठेवावे लागेल, असं सांगत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लॉकडाउनची घोषणा केली.
राज्यातील पॉझिटिव्हिटी दर हा १८ टक्क्यांवर असताना राज्य खुलं ठेवता येणार नाही, असं शिवराज सिंह चौहान म्हणाले.
vaccination : 'राज्यांनो संवेदनशील व्हा, लसीकरणाचा वेग कमी होऊ देऊ नका'
केरळमध्येही लॉकडाउन घोषित
केरळ सरकारने ही करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात लॉकडाउन ( kerala lockdown ) घोषित केला आहे. केरळमध्ये ८ ते १६ मे दरम्यान संपूर्ण लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.