अ‍ॅपशहर

शिवराजसिंह यांची गांधीगिरी; उपोषण सुरू

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'गांधीगिरी'चा मार्ग अवलंबिला असून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केले आहे.

Maharashtra Times 10 Jun 2017, 1:15 pm
मटा ऑनलाइन वृत्त । भोपाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम madhya pradesh farmers agitation cm shivraj singh chouhan sit on fast for peacein bhopals dussehra maidan
शिवराजसिंह यांची गांधीगिरी; उपोषण सुरू


मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'गांधीगिरी'चा मार्ग अवलंबिला असून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी भोपाळमध्ये उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत राज्यातील हिंसाचार थांबणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी भोपाळ येथील दशहरा मैदानावर उपोषण सुरू केले आहे. व्यासपीठावर त्यांच्या पत्नी साधना सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूलाल गौर, प्रभात झा यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. शेतकऱ्यांविषयी आपल्या मनात आदर आहे. काही लोक राज्यातील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मध्य प्रदेशात आगी लागू नका. मुलांच्या हातात दगड देऊ नका. सरकार शेतकऱ्यांसोबत बोलायला तयार आहे पण तरीही राज्यात शेतकरी आंदोलन करीत आहेत. आमच्या सरकारच्या काळात ४० लाख एकर शेती सिंचनाखाली आली. ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यांवर संकट आले त्या-त्या वेळी त्यांच्याकडे मी गेलो. तरीही राज्यात आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांशी थेट बोलता यावे यासाठी आपण उपोषणाचा मार्ग अवलंबिला असल्याचे शिवराजसिंह यांनी स्पष्ट केले.
आंदोलन तब जायज़ है, जब सरकार न सुने। मैं आपसे चर्चा के लिए बैठा हूँ। आइये, बात करें: सीएम @ChouhanShivraj #Shivraj4Peace pic.twitter.com/faWLHUchbo — CMO Madhya Pradesh (@CMMadhyaPradesh) June 10, 2017
शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाऊ शकत नाही

शेतकऱ्यांकडून आम्ही व्याज घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाऊ शकत नाही, असे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी सांगितले. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ शेतकरी ठार झाले होते.
Madhya Pradesh farmers' agitation: Congress workers protest in Bhopal. #Mandsaur pic.twitter.com/Wgy9U1qCny — ANI (@ANI_news) June 10, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज