अ‍ॅपशहर

देशात १७३ पूरबळी; मदतकार्याला वेग

देशातील पूरबळींची संख्या १७३ वर पोहचली असून पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या चार राज्यांत एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचाव, मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2019, 9:40 pm
नवी दिल्ली : देशातील पूरबळींची संख्या १७३ वर पोहचली असून पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरात या चार राज्यांत एनडीआरएफ व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचाव, मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ndrf-rescue-operation


पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे हाहाकार उडाला. कर्नाटक, केरळ, गुजरातमध्येही विविध भागांत अशीच पूरस्थिती राहिली. त्याचा फटका किमान १२ लाख लोकांना बसला. सोमवारी केरळमधील पूरबळींची संख्या वाढून ७६ झाली तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांत ही संख्या ९७ वर पोहचली. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात १२५ जण पुरात अडकले होते. भारतीय हवाईदलाने या सर्वांना सुरक्षितपणे तिथून बाहेर काढले.



दरम्यान, महाराष्ट्र व कर्नाटकात पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी वेगाने ओसरू लागले आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनही स्थिती सामान्य करण्यासाठी सरसावले आहे. कोल्हापुरात पुणे-बेंगळुरू महामार्गावरील पाणी कमी झाल्याने आठ दिवसांपासून बंद असलेली या मार्गावरील वाहतूक आज सुरू करण्यात आली.

उत्तराखंड-काश्मिरात ९ बळी

उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर वाढला असून चामोली जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या गावांत दरड कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा व तिच्या ९ महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये रेसाई जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज