अ‍ॅपशहर

सीमाप्रश्न म्हणजे कौरव पांडवाचे युद्ध नाहीः संजय राऊत

कानडी बांधव राज्यात जिथे राहतात, तिथे कानडी शाळांना आमचे सरकार अनुदान देते, भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे. आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. सीमाप्रश्न म्हणजे काही कौरव पांडवाचे युद्ध नाही. या ठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपले रोखठोक विचार मांडले. राऊत हे कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांची एक प्रकट मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या मुलाखतील त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2020, 9:06 am

नागरिकत्वात हक्कांसोबत कर्तव्येही येतात: सरन्यायाधीश

बेळगावः कानडी बांधव राज्यात जिथे राहतात, तिथे कानडी शाळांना आमचे सरकार अनुदान देते, भाषांमध्ये वाद असू नये, कारण आपला देश एक आहे. आमच्या मनात खोट नाही, सर्वच आपले आहेत. सीमाप्रश्न म्हणजे काही कौरव पांडवाचे युद्ध नाही. या ठिकाणी दोन्ही बाजूने पांडव आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपले रोखठोक विचार मांडले. राऊत हे कर्नाटक दौऱ्यावर असून त्यांची एक प्रकट मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या मुलाखतील त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut


कर्नाटकातील अनेक कलावंत, साहित्यिक यांचे महाराष्ट्रातील साहित्यामध्ये मोठे योगदान आहे. संजय राऊत यांनी गिरीश कर्नाड, भीमसेन जोशी पंडित, अभिनेते रजनीकांत यांचा आवर्जून उल्लेख केला. बेळगावमध्ये मराठी भाषेची मशाल पेटलेली आहे. बेळगावमध्येच नाही तर महाराष्ट्रातही मराठीसाठी लढावे लागते. भाषे-भाषेमध्ये वाद असायला नको, कारण देश एक आहे. मुंबई, सोलापूरसह इतर महाराष्ट्रतील जिल्ह्यातील कानडी भाषेंच्या शाळांना अनुदान देण्याचे काम आम्ही करतोय. ज्या महानगर पालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे, तेथील कन्नड शाळा टिकावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येथील शाळांना अनुदान किंवा हवी ती मदत केली जाते. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठिकाणी कन्नड शाळांना अनुदान दिले आहे, असे राऊत म्हणाले.

बेळगाव येथील व्याखानासाठी संजय राऊत यांचे शनिवारी दुपारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेने विमानतळ परिसर दणाणून सोडला होता. राऊत यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर कन्नड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. संजय राऊत यांनी एका मुलाखतीत विविध विषयावर आपले मते व्यक्त केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय मतभेद, मात्र कौटुंबिक नाते अजूनही कायम आहे. शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केले नसते तर देशाला संजय राऊत दिसला नसता, असेही ते एका प्रश्नावर बोलताना म्हणाले. वृत्तपत्रांमध्ये क्रांती करण्याची तर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये उलथापालथ करण्याची ताकद आहे, असेही ते म्हणाले.


शबाना आझमींना मुंबईतील रुग्णालयात हलवले

CAA राज्यांना लागू करावाच लागणारः सिब्बल

'देशहितासाठी नव्हे, कुटुंबासाठी देशाची फाळणी'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज