मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाचा क्लायमॅक्स जवळ आल्याचं दिसत आहे. शिंदेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गुजरातमधील बडोद्यात झालेल्या भेटीवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेसुद्धा उपस्थित असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस मुंबई विमानतळावरुन बडोद्याला गेले. तर तिकडे आसाममधील गुवाहाटीतील पंचतारांकित रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे प्रायव्हेट जेटने बडोद्याला गेल्याचं बोललं जातं. रात्रभर झालेल्या भेटीगाठींनंतर शनिवारी पहाटे पावणेसात वाजताच्या सुमारास ते पुन्हा गुवाहाटीला परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून शनिवारी सकाळपर्यंत अमित शाह बडोद्यात होते. ते सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. मात्र फडणवीस आणि शिंदे यांच्यासोबत त्यांची एकत्र भेट झाली का, हे निश्चित नाही.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची डळमळीत झाल्याची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे आपल्या बंडावर ठाम असताना ठाकरेंनीही परतीचे दोर कापले आहेत. उलटपक्षी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शिंदेंना आपला गट भाजपमध्ये विलीन करण्यावाचून पर्याय नसल्याचंही बोललं जात आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, पोस्टरवर भ** लिहून घोषणाबाजी
आता कारवाई होणार
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं मन वळविण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवसेना नेतृत्वाकडून झाला. पण काही केल्या शिंदे माघारी फिरायला तयार नाहीयेत. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केली. पण ते माघारी यायला तयार नाहीयेत. त्यांना कालपर्यंत मुदत होती. त्यांचं मंत्रिपद काढण्याविषयी पुढच्या २४ तासांत निर्णय घेतला जाईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांचं मंत्रिपद धोक्यात, २४ तासात कारवाई होणार?
"शिवसेना ही त्यांची आई आहे. त्यांनी यायला हवं होतं. पण आता त्यांची वेळ निघून गेली आहे. त्यांना काही गोष्टींची लालुच लागली आहे. काही आमिषं दाखवली जात आहेत. आताचं बंड सत्तेतील अधिक वाटा मिळावा, यासाठीचं आहे. महत्वकांक्षा, लालूच आणि आमिष या तीन गोष्टींमुळे सध्याचं बंड आहे. सध्या गुवाहाटीमध्ये असलेल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचा हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नाहीये. पण असो ज्यांना जायचंय, त्यांना थांबवू शकत नाही. आम्ही पुन्हा शिवसेना पक्ष उभा करु", असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : 'शिवसेनेत हिंदुत्त्वाचा आग्रह म्हणजे बंडखोरी कशी?' मंत्री संदिपान भुमरेंचा सवाल
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची डळमळीत झाल्याची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदे आपल्या बंडावर ठाम असताना ठाकरेंनीही परतीचे दोर कापले आहेत. उलटपक्षी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे शिंदेंना आपला गट भाजपमध्ये विलीन करण्यावाचून पर्याय नसल्याचंही बोललं जात आहे.
हेही वाचा : एकनाथ शिंदेंविरोधात शिवसैनिक आक्रमक, पोस्टरवर भ** लिहून घोषणाबाजी
आता कारवाई होणार
बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचं मन वळविण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवसेना नेतृत्वाकडून झाला. पण काही केल्या शिंदे माघारी फिरायला तयार नाहीयेत. त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केली. पण ते माघारी यायला तयार नाहीयेत. त्यांना कालपर्यंत मुदत होती. त्यांचं मंत्रिपद काढण्याविषयी पुढच्या २४ तासांत निर्णय घेतला जाईल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांच्यासह ७ जणांचं मंत्रिपद धोक्यात, २४ तासात कारवाई होणार?
"शिवसेना ही त्यांची आई आहे. त्यांनी यायला हवं होतं. पण आता त्यांची वेळ निघून गेली आहे. त्यांना काही गोष्टींची लालुच लागली आहे. काही आमिषं दाखवली जात आहेत. आताचं बंड सत्तेतील अधिक वाटा मिळावा, यासाठीचं आहे. महत्वकांक्षा, लालूच आणि आमिष या तीन गोष्टींमुळे सध्याचं बंड आहे. सध्या गुवाहाटीमध्ये असलेल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचा हिंदुत्वाशी काडीमात्र संबंध नाहीये. पण असो ज्यांना जायचंय, त्यांना थांबवू शकत नाही. आम्ही पुन्हा शिवसेना पक्ष उभा करु", असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : 'शिवसेनेत हिंदुत्त्वाचा आग्रह म्हणजे बंडखोरी कशी?' मंत्री संदिपान भुमरेंचा सवाल