अ‍ॅपशहर

संघात जातीवाद नसल्यामुळे गांधींजी खूश होते: भागवत

१९४७मध्ये महात्मा गांधी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत आले होते. त्यावेळी संघात जातीवाद नसल्याचं पाहून ते खूश झाले होते. तसेच संघाच्या शिस्तीचंही त्यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. संघ स्वयंसेवक दररोज प्रात स्मरणी एकात्मता स्त्रोत महात्मा गांधींच्या नावाचा उच्चार करून त्यांच्या जीवनकार्याचं स्मरण करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2019, 10:12 pm
नवी दिल्ली: १९४७मध्ये महात्मा गांधी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत आले होते. त्यावेळी संघात जातीवाद नसल्याचं पाहून ते खूश झाले होते. तसेच संघाच्या शिस्तीचंही त्यांनी तोंडभरून कौतुक केलं होतं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. संघ स्वयंसेवक दररोज प्रात स्मरणी एकात्मता स्त्रोत महात्मा गांधींच्या नावाचा उच्चार करून त्यांच्या जीवनकार्याचं स्मरण करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mohan-bhagwat


महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त संघाच्या एका संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखात मोहन भागवत यांनी महात्मा गांधींबाबतची ही आठवण सांगितली आहे. फाळणीच्या रक्तरंजित कालखंडात दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाजवळच असलेल्या संघाच्या शाखेत गांधीजी आले होते. त्याचे वृत्त २७ डिसेंबर १९४७च्या हरिजनमध्ये छापून आले आहे. संघातील शिस्तबद्धता आणि संघ स्वयंसेवकांमध्ये नसलेली जातीभेदाची भावना पाहून ते खूश झाले होते, असं या लेखात भागवत यांनी म्हटलं आहे.

१९३५मध्ये वर्ध्याजवळ भरविण्यात आलेल्या संघ शिबिरालाही गांधींनी भेट दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी गांधीजींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी हेडगेवार आणि गांधीजींमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील आजही उपलब्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या स्वदेशीचाही पुरस्कार केला. स्वत्वाच्या आधारे जगण्याला नवीन आयाम देण्यासाठीच गांधींजींनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. मात्र गुलामीची मानसिकता असलेल्या लोकांनी गांधींच्या या धोरणाकडे दुर्लक्ष करून पश्चिमेकडून आलेल्या गोष्टींनाच प्रमाण मानलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सत्तेच्या जोरावर शिक्षणाचं विकृतीकरण करून आर्थिकदृष्ट्या सर्वांना आपले आश्रित बनविण्यावर पाश्चिमात्यांनी जोर दिला होता. त्यामुळेच महात्मा गांधींनी स्वदेशीचा पुरस्कार केला होता. पाश्चिमात्यांना टक्कर देण्यासाठी गांधींनी हा पर्याय दिला होता. मात्र गुलामीची मानसिकता असलेल्यांनी गांधींची ही भूमिका न समजून घेता पश्चिमेकडून आलेल्या प्रत्येक गोष्टींचा स्विकार केला. आपल्या पूर्वजांचा गौरव आणि त्यांनी दिलेले संस्कार धुडकावून लावत गुलामीची मानसिकता असलेल्या लोकांनी पाश्चिमात्यांचं लांगूलचालन सुरू केलं. त्याचा प्रभाव आजही भारताच्या दिशेवर आणि दशेवर झालेला आपल्याला पाह्यला मिळतो, असंही त्यांनी या लेखात शेवटी नमूद केलं आहे.

दरम्यान, महात्मा गांधी यांच्या जयंतीनित्ताने आज देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गुजरातमधील साबरमती आश्रमात जाऊन गांधींजींच्या फोटोंना पुष्पहार अर्पण केले.

गांधीजींवर मोदींचा 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये लेख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज