अ‍ॅपशहर

मोदी सरकारनेच अभिनेत्याचा जीव घेतला, ममतांचा हल्लाबोल

बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तापस पॉल यांच्या निधनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. केंद्र सरकारच्या 'सूडाच्या राजकारणा'मुळे आतापर्यंत तीन मृत्यू बघितले, असा आरोप ममतांनी केलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 4:40 pm
नवी दिल्लीः बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार तापस पॉल यांच्या निधनाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलाय. केंद्र सरकारच्या 'सूडाच्या राजकारणा'मुळे आतापर्यंत तीन मृत्यू बघितले, असा आरोप ममतांनी केलाय. चिटफंड घोटाळा प्रकरणात तापस पॉल यांच्या आरोप होते. या आरोपांवरून त्यांची चौकशी सुरू होती. या प्रकरणात बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे अनेक नेत्यांवरही आरोप आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mamata-banerjee
file photo


केंद्र सरकारच्या 'सूडाच्या राजकारणा'चा निषेध करते. या राजकारणापायी डोळ्यासमोर तिघांचा मृत्यू बघितला. कायद्याला आपलं काम करू द्यावं. पण आरोपांमुळे दिवसेंदिवस अपमान लोकांना संपवतोय, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

तापस पॉल यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. पॉल मुलीला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. यानंतर कोलकात्याला परतत असताना मुंबई विमानतळावर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले. हृदया संबंधी आजारामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

तापस पॉल हे कृष्णानगरमधून दोन वेळा खासदार आणि अलीपूरमधून आमदार झाले होते. सीबीआयने २०१६ मध्ये रोझ व्हॅली चिटफंड प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. १३ महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. यानंतर ते चित्रपट आणि राजकारणापासून दूर होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज