अ‍ॅपशहर

cyclone yaas : PM मोदींच्या बैठकीत ममता आर्धा तास उशिराने आल्या, रिपोर्ट देऊन काही वेळात निघून गेल्या!

पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना प्रामुख्याने यास चक्रीवादळाचा फटका बसला. या पूर्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशातील नुकसानीची हवाई पाहणी केली. यानंतर आढावा बैठक घेतली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2021, 7:35 pm
कोलकाताः 'यास' चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( pm modi ) आज पश्चिम बंगाल आणि ओडिशाला भेट दिली. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील कलाईकुंडा विमानतळावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ( mamata banerjee ) पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यानंतर चक्रीवादळासंबंधी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल पंतप्रधान मोदींना सोपवला. यातून ममतांनी केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी आणि त्यांचे मुख्य सचिव या आढावा बैठकीसाठी ३० मिनिटं उशिराने पोहोचले. विशेष म्हणजे ते त्याच परिसरात होते. बैठकीत उपस्थित झाल्यानंतर त्यांनी चक्रवादळासंबंधी कागदपत्रे दिली. आपल्याला दुसरी मिटींग आहे, असं सांगत त्या निघून गेल्या. यानंतर ममता बॅनर्जी या दीघाला निघून गेल्या आणि दीघामध्ये प्रशासनाची बैठक घेतली. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत कलाईकुंडामध्ये बैठक झाली. पंतप्रधान मोदींसह राज्यपाल जगदीप धनखड, पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि केंद्रीय राज्यमंत्री देवश्री चौधरी यांच्या इतर काही जण उपस्थित होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mamata banerjee - pm modi
यास चक्रीवादळ; PM मोदींना ममता भेटल्या, बैठकीत आर्धा तास बसल्या नी रिपोर्ट देऊन निघून गेल्या


सुवेंदू अधिकारींवर नाराज असल्याने ममता बॅनर्जी या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत सहभागी झाली नाही, असं सांगण्यात येतंय. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी राज्याला ५०० कोटींच्या आर्थिक मदतसह केंद्रीय पथक पाठवणार असल्याची घोषणा केली. चक्रीवादळातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख आणि गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलीय.

दरम्यान, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीतून निघाल्यानंतर ममता बॅनर्जी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी बैठक बोलावली. पण दीघामध्ये आपली बैठक आहे, आपल्या लक्षात नव्हतं. यामुळे पंतप्रधानांच्या बैठकीला गेले. पंतप्रधान मोदींना अहवाल दिला. दीघाच्या पुनर्विकासासाठी २० हजार कोटी आणि सुंदरबनसाठी १० हजार कोटींची आपण मागणी केली. यानंतर पंतप्रधानांची परवानगी घेऊन आपण बैठतून बाहेर पडलो आणि इथे आलो, असं ममता बॅनर्जींनी दीघातील बैठकीत सांगितलं.

TMC in UP: आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत मुख्यमंत्री योगींना 'तृणमूल काँग्रेस' देणार खुलं

पंतप्रधान मोदींनी आधी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची हवाई पाहणी केली. यास चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या राज्यांसाठी १००० कोटींची मदत जाहीर केली. यात ओडिशाला ५०० कोटी आणि पश्चिम बंगाल आणि झारखंडला मिळून ५०० कोटींची मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या मदतीत दुजाभाव होत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.

Covid19: पंतप्रधानांच्या 'नौटंकी'मुळेच देशात करोना संसर्गाची दुसरी लाट : राहुल गांधी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज