अ‍ॅपशहर

'देशात असहिष्णुतेचे वातावरण; एकजूट राहा'

'देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असल्याने लोकांनी एकजूट राहायला हवे', असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Maharashtra Times 26 Jun 2017, 6:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mamata banerjees eid ul fitr message stay united despite intolerance in country
'देशात असहिष्णुतेचे वातावरण; एकजूट राहा'


'देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असल्याने लोकांनी एकजूट राहायला हवे', असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. ईदनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 'मला माहित आहे, की देशात असहिष्णुतेचे वातावरण असून देशाला खूप यातना दिल्या आहेत'. संघटित राहा. म्हणजे कोणी तुम्हाला नुकसान पोहोचविणार नाही. संयुक्त राष्ट्रामधील कार्यक्रमात सहभागी झालेल्या ममता बॅनर्जी या रविवारी मायदेशी परतल्या. आपण सर्वात आधी माणूस आहोत. त्यानंतर हिंदू, मुस्लिम आणि ईसाई आहोत. आपण सर्व एक आहोत. आपण सर्वांसाठी असून सर्वांसाठी लढतोय, असेही त्या म्हणाल्या.

ঈদ মোবারক #EidMubarak pic.twitter.com/LkgfEJyhpE — Mamata Banerjee (@MamataOfficial) June 25, 2017
मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणुसकीला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार. आपण सर्व एक असून आपल्याला कोणी तोडू शकत नाहीत, आपली लढाई ही सर्वांसाठी सुरूच राहणार, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. मुलीच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पश्चिम बंगाल सरकारच्या योजनेला लोकसेवा पुरस्कार देऊन संयुक्त राष्ट्राकडून गौरविण्यात आले. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी नेदरलँड्सला गेल्या होत्या व रविवारी भारतात परतल्या. आज त्या ईदच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज