वृत्तसंस्था, कोलकाता/पुरुलिया
'राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच आंदोलन पुकारणे हे लोकशाहीच्या परंपरेला लाजिरवाणे आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वत:च आंदोलन करून लोकशाहीची नामुष्की केली आहे,' अशी जळजळीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली. केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचलेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी झुगारून मंगळवारी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे सभा घेतली. योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर झारखंडमधील बोकारो येथे उतरवण्यात आले. तिथून योगी कारने पुरुलिया येथे दाखल झाले. तेथे जाहीर सभेला मार्गदर्शन करताना योगींनी ममता यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. 'माझ्यासारख्या संन्याशाला पश्चिम बंगालच्या भूमित येण्यापासून का रोखले गेले,' असाही प्रश्न योगी यांनी विचारला आहे.
योगी म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजवटीत बंगालमधील गरिबांचे शोषण केले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांचा आशिर्वाद आहे. शारदा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सातत्याने त्या केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवत आहे. मात्र, केंद्रीय यंत्रणेला तपासापासून रोखणे चुकीचे असून, त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. ममतांची कृती लाजिरवाणी आहे.'
हुसेन यांच्या रॅलीला नकार
नवी दिल्ली : भाजपचे नेते शाहनवाझ हुसेन यांना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे रॅली घेण्यास बंगाल सरकारने परवानगी नाकारली आहे. 'परवानगी नाकारल्यानंतरही मी माझ्या रॅलीला जाणार आहे,' असे हुसेन यांनी स्पष्ट केले. या रॅलीबाबत पूर्वपरवानगी मागण्यात आली होती. मात्र, तृणमूल काँग्रेस सरकारने मुद्दाम या रॅलीला परवानगी नाकारली. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.
'ममतांमुळे लोकशाही धोक्यात'
लखनौ : 'कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना ममता बॅनर्जी यांनी पाठीशी घातल्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकशाहीच धोक्यात आली आहे,' असा आरोप उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केला आहे. सीबीआयच्या कारवाईविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'लोकशाही बचाव' आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर मौर्य यांनी हे मत मांडले आहे. बंगालमध्ये लोकशाही धोक्यात आली असून, ममतांचे सरकार वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही मौर्य यांनी केला.
'भ्रष्ट नेत्यांची टोळी'
नवी दिल्ली : 'सीबीआयच्या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनी दिलेली प्रतिक्रिया अवाजवी आणि चुकीची आहे. ममतांना पाठिंबा देणारे लोक म्हणजे भ्रष्ट नेत्यांची एक टोळीच आहे,' अशी टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. 'फेसबुक पोस्ट'द्वारे त्यांनी ही टीका केली आहे. 'चिटफंड गैरव्यवहाराच्या तपासावर कोर्टाचे लक्ष आहे. सीबीआयने या प्रकरणात काही जणांना अटक केली आहे. अनेक जणांना जामीनही मिळाला आहे. जर पोलिसांची चौकशी तपासासाठी आवश्यक असेल तर ही परिस्थिती आणीबाणी कशी काय असू शकते,' असा सवाल जेटली यांनी उपस्थित केला आहे.
'राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच आंदोलन पुकारणे हे लोकशाहीच्या परंपरेला लाजिरवाणे आहे. ममता बॅनर्जी यांनी स्वत:च आंदोलन करून लोकशाहीची नामुष्की केली आहे,' अशी जळजळीत टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली. केंद्र सरकार विरुद्ध पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचलेला असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी झुगारून मंगळवारी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे सभा घेतली. योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर झारखंडमधील बोकारो येथे उतरवण्यात आले. तिथून योगी कारने पुरुलिया येथे दाखल झाले. तेथे जाहीर सभेला मार्गदर्शन करताना योगींनी ममता यांच्यावर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. 'माझ्यासारख्या संन्याशाला पश्चिम बंगालच्या भूमित येण्यापासून का रोखले गेले,' असाही प्रश्न योगी यांनी विचारला आहे.
योगी म्हणाले, 'ममता बॅनर्जी यांनी आपल्या राजवटीत बंगालमधील गरिबांचे शोषण केले आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांचा आशिर्वाद आहे. शारदा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सातत्याने त्या केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवत आहे. मात्र, केंद्रीय यंत्रणेला तपासापासून रोखणे चुकीचे असून, त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. ममतांची कृती लाजिरवाणी आहे.'
हुसेन यांच्या रॅलीला नकार
नवी दिल्ली : भाजपचे नेते शाहनवाझ हुसेन यांना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे रॅली घेण्यास बंगाल सरकारने परवानगी नाकारली आहे. 'परवानगी नाकारल्यानंतरही मी माझ्या रॅलीला जाणार आहे,' असे हुसेन यांनी स्पष्ट केले. या रॅलीबाबत पूर्वपरवानगी मागण्यात आली होती. मात्र, तृणमूल काँग्रेस सरकारने मुद्दाम या रॅलीला परवानगी नाकारली. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.
'ममतांमुळे लोकशाही धोक्यात'
लखनौ : 'कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना ममता बॅनर्जी यांनी पाठीशी घातल्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकशाहीच धोक्यात आली आहे,' असा आरोप उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केला आहे. सीबीआयच्या कारवाईविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'लोकशाही बचाव' आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर मौर्य यांनी हे मत मांडले आहे. बंगालमध्ये लोकशाही धोक्यात आली असून, ममतांचे सरकार वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही मौर्य यांनी केला.
'भ्रष्ट नेत्यांची टोळी'
नवी दिल्ली : 'सीबीआयच्या कारवाईविरोधात ममता बॅनर्जी यांनी दिलेली प्रतिक्रिया अवाजवी आणि चुकीची आहे. ममतांना पाठिंबा देणारे लोक म्हणजे भ्रष्ट नेत्यांची एक टोळीच आहे,' अशी टीका केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. 'फेसबुक पोस्ट'द्वारे त्यांनी ही टीका केली आहे. 'चिटफंड गैरव्यवहाराच्या तपासावर कोर्टाचे लक्ष आहे. सीबीआयने या प्रकरणात काही जणांना अटक केली आहे. अनेक जणांना जामीनही मिळाला आहे. जर पोलिसांची चौकशी तपासासाठी आवश्यक असेल तर ही परिस्थिती आणीबाणी कशी काय असू शकते,' असा सवाल जेटली यांनी उपस्थित केला आहे.