अ‍ॅपशहर

होणाऱ्या बायकोला सोबत घेऊन पळाला तरुण, पळून जाण्यामागील कारण ऐकून पोलीसही अवाक्

Bihar Latest News: घरचे लग्नासाठी ऐकत नाही म्हणून प्रियकर प्रेयसी घर सोडून पळून जात असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. पण, लग्न ठरलं साखरपुडा झाला आणि तरीही होणारे पती-पत्नी पळून गेल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. त्यांच्या पळून जाण्यामागील कारण जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा कुटुंबीयांसोबत पोलीसही अवाक् झालेत.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 2:49 pm
पाटणा: बिहारमधील सारण जिल्ह्यातील पानापूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. लग्नाला काही महिने उशीर झाल्यामुळे येथे एका तरुणाने होणाऱ्या पत्नीला घेऊन पळ काढला. या घटनेबाबत ज्यानेही ऐकलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम man runs away with fiance


पुढच्या वर्षी होणार होते लग्न

हा तरुण दरियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असून तरुणी पानापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. या मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी मे महिन्यात त्यांचा साखरपुडा केला होता. तर लग्न पुढच्या वर्षी मे महिन्यात होणार होते.

हेही वाचा -गलिच्छ! रोज २ तास जॉगिंग, पण ४ महिन्यांपासून आंघोळ नाही, अखेर कंटाळून रुममेटचा मोठा निर्णय

दोघांनी प्लान केला आणि पळ काढला

लग्न ठरल्यानंतर दोघेही मोबाईलवर एकमेकांशी बोलायचे. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांनी एक प्लॅन बनवला आणि ८ नोव्हेंबरला त्यांनी घरातून पळ काढला. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, तिचा काहीही सुगावा न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार केली.

पळून जाण्यामागील कारण ऐकून सारेच अवाक्

हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. पोलीस त्यांना शोधतच होते तेव्हा पोलिसांना ते २ डिसेंबर रोजी हे दोघेही पानापूरला पोहोचल्याची माहिती मिळाली. जेव्हा लोकांनी या दोघांना पळून जाण्याचे कारण विचारले असता तरुणाने सांगितले की, त्यांच्या लग्नाची तारीख अजून दूर आहे आणि दोघांना लवकरच लग्न करायचे होते. म्हणून ते पळून गेले.

हेही वाचा -हडपसरमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स आणि पीएमटीची समोरासमोर धडक, गाड्यांची स्थिती पाहून धडकी भरेल...

पोलिसांच्या उपस्थितीत लग्न

हे सर्व सुरु असताना पोलीस तिथे पोहोचले. पानापूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विकास कुमार यांच्या मध्यस्थीनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला. यानंतर मुलीचे नातेवाईक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पानापूर पोलिसांच्या उपस्थितीत दोघांचाही विवाह मंदिरात पार पडला.

परिसरात या लग्नाची चर्चाच चर्चा

दोघांनी उचललेले हे पाऊल आणि पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या लग्नाची चर्चा संपूर्ण परिसरात आहे. वधू आणि वर दोन्ही बाजूचे लोक या लग्नाबद्दल चर्चा करत आहेत.

हेही वाचा -पाठलाग करुन, रस्ता अडवून मैत्रीची जबरदस्ती; अल्पवयीन रोड रोमिओमुळे १७ वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख