गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रिक्षा चालकानं पत्नीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. पत्नीच्या प्रियकराचा गळा कुऱ्हाडीनं कापून त्यानं मृतदेहाचे ४० तुकडे केले. त्यानंतर तुकडे तीन गोण्यांमध्ये भरून घरापासून एक किलोमीटरवर असलेल्या कालव्यात फेकले. दोन दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे सापडले. त्यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे रिक्षा चालक मिलालला (३४) अटक केली.
आरोपी मिलालनं हत्येची कबुली दिली आहे. मिलालनं त्याची पत्नी पूनमला अक्षयला (२४) बोलवायला आणि घरी झोपायला सांगितलं. अक्षय झोपलेला असताना मिलालनं त्याची हत्या केली. हत्येपासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतची योजना आरोपीनं आधीच आखून ठेवली होती. आपल्याला गुन्ह्याचा कोणताच पश्चाताप नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
अक्षय आणि पूनमचे प्रेमसंबंध असल्याचा संशय अनेक दिवसांपासून होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे त्याची खात्रीच पटली. एक दिवस पूनम एकाएकी बेपत्ता झाली. ती अक्षयच्या राजस्थानातील घरी गेली होती. नातेवाईकांनी मिन्नतवाऱ्या केल्यानंतर ती घरी परतली. तेव्हाच मिलालनं अक्षयला संपवण्याचा पण केला. पत्नी पूनम लपूनछपून अक्षयसोबत फोनवरून बोलत असल्याचं मिलालनं अनेकदा पाहिलं. अक्षय कधीकाळी मिलालचा चांगला मित्र होता.
मिलाल अक्षयच्या हत्येसाठी योग्य संधीची वाट पाहत होता. पत्नी अक्षयला घरी बोलावण्यास तयार होणार नाही, असं त्याला वाटत होतं. मात्र ती राजी झाली. याच बहाण्यानं अक्षयची भेट होईल असा विचार तिनं केला. अक्षयदेखील लगेच आला. अक्षय झोपल्यानंतर मिलालनं त्याच्यावर कुऱ्हाडीनं वार केले. त्याच्या मृतदेहाचे २० तुकडे करून ते गोण्यांमध्ये भरले आणि त्या गोण्या घरापासून १ किलोमीटर दूर असलेल्या कालव्यात फेकून दिल्या.
आरोपी मिलालनं हत्येची कबुली दिली आहे. मिलालनं त्याची पत्नी पूनमला अक्षयला (२४) बोलवायला आणि घरी झोपायला सांगितलं. अक्षय झोपलेला असताना मिलालनं त्याची हत्या केली. हत्येपासून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतची योजना आरोपीनं आधीच आखून ठेवली होती. आपल्याला गुन्ह्याचा कोणताच पश्चाताप नसल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
अक्षय आणि पूनमचे प्रेमसंबंध असल्याचा संशय अनेक दिवसांपासून होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे त्याची खात्रीच पटली. एक दिवस पूनम एकाएकी बेपत्ता झाली. ती अक्षयच्या राजस्थानातील घरी गेली होती. नातेवाईकांनी मिन्नतवाऱ्या केल्यानंतर ती घरी परतली. तेव्हाच मिलालनं अक्षयला संपवण्याचा पण केला. पत्नी पूनम लपूनछपून अक्षयसोबत फोनवरून बोलत असल्याचं मिलालनं अनेकदा पाहिलं. अक्षय कधीकाळी मिलालचा चांगला मित्र होता.
मिलाल अक्षयच्या हत्येसाठी योग्य संधीची वाट पाहत होता. पत्नी अक्षयला घरी बोलावण्यास तयार होणार नाही, असं त्याला वाटत होतं. मात्र ती राजी झाली. याच बहाण्यानं अक्षयची भेट होईल असा विचार तिनं केला. अक्षयदेखील लगेच आला. अक्षय झोपल्यानंतर मिलालनं त्याच्यावर कुऱ्हाडीनं वार केले. त्याच्या मृतदेहाचे २० तुकडे करून ते गोण्यांमध्ये भरले आणि त्या गोण्या घरापासून १ किलोमीटर दूर असलेल्या कालव्यात फेकून दिल्या.