अ‍ॅपशहर

५९१ टॅटू गोंदवून जवानांना आदरांजली!

देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढून देशवासियांना सुरक्षिततेची हमी देणाऱ्या सैनिकांबद्दल आपल्याला कायम आदर असतो. पण दिल्लीच्या एका तरुणाने हा आदर वेगळ्या पद्धतीने दर्शवला आहे. त्याने कारगील शहिदांना आदरांजली देण्याचे ठरवले आणि चक्क स्वत:च्या शरीरावर ५९१ टॅटू गोंदवले. हे ५९१ टॅटू म्हणजे कारगील युद्धात वीरमरण आलेल्या ५५९ सैनिकांची नावे तसेच आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची रेखाचित्रे आहेत.

EiSamay 18 Feb 2019, 6:55 pm
कमलेश चौधरी । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhishek-gautam


देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढून देशवासियांना सुरक्षिततेची हमी देणाऱ्या सैनिकांबद्दल आपल्याला कायम आदर असतो. पण दिल्लीच्या एका तरुणाने हा आदर वेगळ्या पद्धतीने दर्शवला आहे. त्याने कारगील शहिदांना आदरांजली देण्याचे ठरवले आणि चक्क स्वत:च्या शरीरावर ५९१ टॅटू गोंदवले. हे ५९१ टॅटू म्हणजे कारगील युद्धात वीरमरण आलेल्या ५५९ सैनिकांची नावे तसेच आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांची रेखाचित्रे आहेत.

अभिषेक गौतम असं या ३० वर्षीय तरुणाचं नाव आहे. व्यवसायाने तो इंटिरिअर डिझायनर आहे. हे टॅटू गोंदवण्यासाठी त्याला तब्बल ८ दिवस लागले. येत्या जूनपासून अभिषेक त्याच्या बाइकवरून देशभर फिरणार आहे. तो तब्बल १५ हजार किलोमीटर्सचा प्रवास करणार आहे. या प्रवासात प्रत्येक दिवशी एका शहिदाच्या कुटुंबीयांना भेटण्याची त्याची योजना आहे. २४ ते २६ जुलै या दरम्यान तो कारगिल युद्ध दिनानिमित्त द्रास क्षेत्रात उपस्थित राहणार आहे.

काश्मीरमधील पुलवामात झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात अवघा देश सहभागी झाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात शहिदांसाठी शोकसभा, शोकसंदेश, हल्ल्याच्या निषेधाचा आवाज उठत आहे. या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना अभिषेक म्हणाला, 'मला ठाऊक आहे की अनेकांना युद्ध हवंय. पण युद्ध हा उपाय नव्हे. खूप लोक युद्धात मारले जातील.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज