नवी दिल्ली: आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-२५च्या माध्यमातून मंगळयानने अवकाशात झेप घेतली. ११ महिन्यांचा प्रवास करून २४ सप्टेंबर रोजी २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत पोहोचले.
इस्रोच्या ‘मार्स ऑर्बायटर मिशन’ (मॉम) मोहिमेचा कालावधी फक्त ६ महिन्यांचा होता. पण हे यान ८ वर्ष ८ दिवस कार्यरत होते. ज्या दिवशी भारताने हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचवण्यास यश मिळवले त्या दिवशी देशाने नवा इतिहास घडवला. अंतराळ मोहिमांच्या इतिहासात तोपर्यंत एकाही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करता आला नव्हता.
वाचा- मंगळयानाने भारताला काय दिले? 'मॉम' नसल्याने देशाचे काय नुकसान होणार
'त्या' सात तासाने संपवले आयुष्य
मंगळयानाने त्याच्या निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा १६ पट अधिक काम केले. हा एक प्रकारचा वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागले. मंगळ ग्रहावर इतकी ग्रहणं लागतात पण त्यातून मंगळयान सूर्यप्रकाशात येत असे आणि मोहिम पुढे नेत होते. पण इस्रोच्या या यानातील बॅटरी सूर्याच्या प्रकाशाशिवाय फक्त १ तास ४० मिनिटे चालू शकत होती. त्यामुळे यावेळी आलेल्या सात तासांच्या लांब ग्रहणामुळे त्याची मोहिम संपुष्ठात आली. या मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर मंगळग्रहावर इतके लांब ग्रहण लागले नसते तर यान अजून काही काळ कार्यरत राहिले असते.
वाचा- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: दुसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास घडला, तब्बल १३ विक्रम झाले
फार कमालीचे होते मंगळयान
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार या वर्षी २०२२ मंगळावर मोठे ग्रहण होणार होते. इस्रोने यानाची रचना अशी केली होती की ग्रहण काळात ते स्वत:ला ग्रहण कक्षेतून बाहेर काढेल. मॉमने अनेक वेळा अशा प्रकारे स्वत:ला ग्रहण कक्षेतून बाहेर काढले होते. यावेळी ग्रहण संपण्याच्या आत त्याचे इंधन संपले.
मंगळयानाशी संपर्क तुटण्याचे आणखी एक कारण हे देखील असू शकते की जेव्हा यानाने ग्रहण कक्षेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पृथ्वीकडे असलेल्या त्याचा अँटीन दुसऱ्या बाजूला वळला आणि संपर्क तुटला. मंगळयानावर पाच पेलोड लावण्यात आले होते. त्याने पहिल्या वर्षी १ टीबी डेटा तर गेल्या पाच वर्षात ५ टीबी डेटा पाठवला होता.
इस्रोच्या ‘मार्स ऑर्बायटर मिशन’ (मॉम) मोहिमेचा कालावधी फक्त ६ महिन्यांचा होता. पण हे यान ८ वर्ष ८ दिवस कार्यरत होते. ज्या दिवशी भारताने हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचवण्यास यश मिळवले त्या दिवशी देशाने नवा इतिहास घडवला. अंतराळ मोहिमांच्या इतिहासात तोपर्यंत एकाही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करता आला नव्हता.
वाचा- मंगळयानाने भारताला काय दिले? 'मॉम' नसल्याने देशाचे काय नुकसान होणार
'त्या' सात तासाने संपवले आयुष्य
मंगळयानाने त्याच्या निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा १६ पट अधिक काम केले. हा एक प्रकारचा वैज्ञानिक चमत्कारच म्हणावा लागले. मंगळ ग्रहावर इतकी ग्रहणं लागतात पण त्यातून मंगळयान सूर्यप्रकाशात येत असे आणि मोहिम पुढे नेत होते. पण इस्रोच्या या यानातील बॅटरी सूर्याच्या प्रकाशाशिवाय फक्त १ तास ४० मिनिटे चालू शकत होती. त्यामुळे यावेळी आलेल्या सात तासांच्या लांब ग्रहणामुळे त्याची मोहिम संपुष्ठात आली. या मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जर मंगळग्रहावर इतके लांब ग्रहण लागले नसते तर यान अजून काही काळ कार्यरत राहिले असते.
वाचा- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: दुसऱ्या टी-२० सामन्यात इतिहास घडला, तब्बल १३ विक्रम झाले
फार कमालीचे होते मंगळयान
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार या वर्षी २०२२ मंगळावर मोठे ग्रहण होणार होते. इस्रोने यानाची रचना अशी केली होती की ग्रहण काळात ते स्वत:ला ग्रहण कक्षेतून बाहेर काढेल. मॉमने अनेक वेळा अशा प्रकारे स्वत:ला ग्रहण कक्षेतून बाहेर काढले होते. यावेळी ग्रहण संपण्याच्या आत त्याचे इंधन संपले.
मंगळयानाशी संपर्क तुटण्याचे आणखी एक कारण हे देखील असू शकते की जेव्हा यानाने ग्रहण कक्षेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पृथ्वीकडे असलेल्या त्याचा अँटीन दुसऱ्या बाजूला वळला आणि संपर्क तुटला. मंगळयानावर पाच पेलोड लावण्यात आले होते. त्याने पहिल्या वर्षी १ टीबी डेटा तर गेल्या पाच वर्षात ५ टीबी डेटा पाठवला होता.