नवी दिल्ली:
'काही लोक काम करतात. पण श्रेय घेत नाहीत. तर काही काही लोक केवळ श्रेय घेण्याचं काम करतात,' अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली.
इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित 'इंदिरा गांधी शांती पुरस्कार' वितरण सोहळ्यात सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती केली. त्या म्हणाल्या की, 'मनमोहन सिंग यांनी कधीच त्यांचा प्रचार केला नाही. त्यांनी कधीच त्यांच्या कामाचं श्रेय घेतलं नाही. पण हल्ली काही लोक कामाचं श्रेय घेत आहेत.'
यावेळी सोनिया गांधी यांनी अनेकदा मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली. मनमोहन सिंग यांनी दीड दशकं इंदिरा गांधींसोबत काम केलं आहे. ते मोठमोठ्या गप्पा मारणारे नाहीत. स्वत:चं कौतुक करणारेही नाहीत. त्यांनी कधीच स्वत:साठी काहीच मागितलं नाही. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जगभर भारताचा सन्मान वाढवला, असं सांगतानाच यापुढेही आम्ही मनमोहन सिंग यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतच राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. केवळ पाच वर्षासाठी काँग्रेसने गांधी-नेहरु कुटुंबाच्या बाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच, असं आव्हान मोदींनी दिलं होतं.
'काही लोक काम करतात. पण श्रेय घेत नाहीत. तर काही काही लोक केवळ श्रेय घेण्याचं काम करतात,' अशा शब्दांत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली.
इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित 'इंदिरा गांधी शांती पुरस्कार' वितरण सोहळ्यात सोनिया गांधी बोलत होत्या. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती केली. त्या म्हणाल्या की, 'मनमोहन सिंग यांनी कधीच त्यांचा प्रचार केला नाही. त्यांनी कधीच त्यांच्या कामाचं श्रेय घेतलं नाही. पण हल्ली काही लोक कामाचं श्रेय घेत आहेत.'
यावेळी सोनिया गांधी यांनी अनेकदा मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली. मनमोहन सिंग यांनी दीड दशकं इंदिरा गांधींसोबत काम केलं आहे. ते मोठमोठ्या गप्पा मारणारे नाहीत. स्वत:चं कौतुक करणारेही नाहीत. त्यांनी कधीच स्वत:साठी काहीच मागितलं नाही. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जगभर भारताचा सन्मान वाढवला, असं सांगतानाच यापुढेही आम्ही मनमोहन सिंग यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेतच राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. केवळ पाच वर्षासाठी काँग्रेसने गांधी-नेहरु कुटुंबाच्या बाहेरचा अध्यक्ष करून दाखवाच, असं आव्हान मोदींनी दिलं होतं.