वृत्तसंस्था, नवी दिल्ली :
'देशातील कृषी क्षेत्राचा 'आत्मनिर्भर भारत' घडविण्यात खूप मोठा वाटा आहे. देशातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला भक्कम बनविले आहे. करोना काळातही शेतकऱ्यांनी ही क्षमता सिद्ध केली आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शेतकऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी कृषी सुधारणा विधेयकांचे समर्थन करून शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल, असेही सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. 'देशातील काही राज्यांनी फळे आणि भाज्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून वगळल्याने शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. आता धान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही हे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकरी आपल्या शेतातील कोणतेही उत्पादन त्यांना हवे तिथे आणि योग्य भावात विकू शकतील,' असे मोदी म्हणाले. मोदी यांनी या वेळी संसदेत नुकतेच मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकांचा आणि या विधेयकांना विरोध करीत असलेल्यांचा थेट उल्लेख केला नाही. परंतु, काँग्रेसच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. 'स्वातंत्र्यानंतर देशाची वाटचाल महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानानुसार झाली असती, तर भारत खूप आधी 'आत्मनिर्भर' बनला असता,' असे मोदी म्हणाले.
वाचा : भगवा रंग फासून पेरियार यांच्या पुतळ्यांचे विद्रुपीकरण
'देशातील कृषी क्षेत्राचा 'आत्मनिर्भर भारत' घडविण्यात खूप मोठा वाटा आहे. देशातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला भक्कम बनविले आहे. करोना काळातही शेतकऱ्यांनी ही क्षमता सिद्ध केली आहे,' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शेतकऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी कृषी सुधारणा विधेयकांचे समर्थन करून शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल, असेही सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी 'मन की बात'मधून देशवासीयांशी संवाद साधला. 'देशातील काही राज्यांनी फळे आणि भाज्या कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून वगळल्याने शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. आता धान्य उत्पादक शेतकऱ्यांनाही हे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकरी आपल्या शेतातील कोणतेही उत्पादन त्यांना हवे तिथे आणि योग्य भावात विकू शकतील,' असे मोदी म्हणाले. मोदी यांनी या वेळी संसदेत नुकतेच मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकांचा आणि या विधेयकांना विरोध करीत असलेल्यांचा थेट उल्लेख केला नाही. परंतु, काँग्रेसच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. 'स्वातंत्र्यानंतर देशाची वाटचाल महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानानुसार झाली असती, तर भारत खूप आधी 'आत्मनिर्भर' बनला असता,' असे मोदी म्हणाले.
वाचा : भगवा रंग फासून पेरियार यांच्या पुतळ्यांचे विद्रुपीकरण