अ‍ॅपशहर

हिमाचल: पावसामुळे ३२३ रस्त्यांवरील वाहतूक बंद

उत्तर भारतातील अनेक भागात पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती असून गावांचा संपर्क तुटला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2019, 3:43 pm
शिमला:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम himachal

उत्तर भारतातील अनेक भागात पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती असून गावांचा संपर्क तुटला आहे.

राज्याच्या अनेक भागात दरड कोसळणे, ढगफुटीसारखे प्रकार घडले असल्याने ३२३ रस्ते आणि नॅशनल हायवे क्र. ५ वर वाहनांची ये-जा थांबवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश वगळता उत्तराखंड आणि राजस्थानातल्या अनेक भागांमध्ये पूरस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकदसान झालं आहे. शिमल्यात आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन तीन जण ठार झाले. अन्य एक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती आहे. एका घराची भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.

कुल्लू जिल्ह्यात रोहरू येथे भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला आहे. एक झाड कोसळून दोन नेपाळी नागरिक तर चंबा येथे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज