मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करणारा अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांनी सुकमा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिल्यानं नक्षल्यांचा जळफळाट झाला आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना मदत न करण्याची धमकीच नक्षलवाद्यांनी दिली आहे.
'नक्षली हल्ल्यात मरण पावणाऱ्या जवानांच्या कुटुंबांना मदत करणं बंद करा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील', अशा धमकीची पत्रकं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीनं प्रसिद्ध केली आहेत. 'सीआरपीएफचे जवान हे मानवाधिकाराचे शत्रू आहेत. बस्तरमधील आदिवासींना संपवण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आलंय. अशा लोकांना मदत करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि पुन्हा असं झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देतो', असं या पत्रकांमध्ये म्हटलंय. या पत्रकांची गंभीर दखल बस्तर पोलिसांनी घेतली आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात सुकमामधील नक्षली हल्ल्यात २५ सीआरपीए जवान शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारनं प्रत्येकी ९ लाखांची, तर सायना नेहवालनं ५०-५० हजारांची मदत दिली होती. तसंच, शहीद जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी, या उद्देशानं अक्षयनं केंद्र सरकारच्या 'भारत के वीर' हे अॅपही तयार केलं आहे. त्यालाही देशवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे नक्षलवाद्यांचा तीळपापड होतोय.
सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करणारा अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांनी सुकमा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिल्यानं नक्षल्यांचा जळफळाट झाला आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना मदत न करण्याची धमकीच नक्षलवाद्यांनी दिली आहे.
'नक्षली हल्ल्यात मरण पावणाऱ्या जवानांच्या कुटुंबांना मदत करणं बंद करा, अन्यथा त्याचे वाईट परिणाम होतील', अशा धमकीची पत्रकं पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीनं प्रसिद्ध केली आहेत. 'सीआरपीएफचे जवान हे मानवाधिकाराचे शत्रू आहेत. बस्तरमधील आदिवासींना संपवण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आलंय. अशा लोकांना मदत करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो आणि पुन्हा असं झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देतो', असं या पत्रकांमध्ये म्हटलंय. या पत्रकांची गंभीर दखल बस्तर पोलिसांनी घेतली आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यात सुकमामधील नक्षली हल्ल्यात २५ सीआरपीए जवान शहीद झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना अक्षय कुमारनं प्रत्येकी ९ लाखांची, तर सायना नेहवालनं ५०-५० हजारांची मदत दिली होती. तसंच, शहीद जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत व्हावी, या उद्देशानं अक्षयनं केंद्र सरकारच्या 'भारत के वीर' हे अॅपही तयार केलं आहे. त्यालाही देशवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे नक्षलवाद्यांचा तीळपापड होतोय.