नवी दिल्ली
भाजप नेत्याच्या मुलाकडून अपहरण करण्याचा आणि छेडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर घरात न बसता या प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या धाडसी वर्णिका कुंडूचे देशभरातून कौतूक होत आहे. केवळ मार्शल आर्ट येत आल्यामुळेच या छेड काढणाऱ्यांशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास आल्याचं वर्णिकाने सांगितलं.
'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली. प्रत्येकासाठी सेल्फ डिफेन्स फार महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पोलीस आले आणि त्यांनी त्या मुलांना रोखलं. पण त्या आधी मी आत्मविश्वासाने या प्रसंगाला सामोरे गेले. भले मी मारामारी केली नसेल. पण मार्शल आर्टस शिकल्यामुळे मनात आत्मविश्वास निर्माण झालेला होता. त्यामुळे अशा प्रसंगांना सामोरे जाताना प्रतिकार करता आला. जर देशातील प्रत्येक मुलगी निडर झाली आणि तिने पुरूषांना घाबरणे बंद केले तर पुरूषही महिलांना घाबरवण्याचं बंद करतील, असं वर्णिकानं सांगितलं.
या प्रसंगानंतर लोकांनी, महिला संघटनांनी आणि माध्यमांनी मला खूप आधार दिला. पाठिंबा दिला. माझ्या जागी कोणत्याही मुलीवर हा प्रसंग आला असता तरी देशातील जनता तिच्या पाठिशी उभी राहिली असती, असं सांगतानाच आई-वडिलांनी कधीच आमच्यात स्त्री-पुरूष असा भेद केला नाही. त्यांनी नेहमीच समान वागणूक देत आम्हाला कोणतीही गोष्ट करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यांनी मुलगी म्हणून नव्हे तर माणूस म्हणून आम्हाला वाढविले, असेही ती म्हणाली.
मी केवळ मुलगी असल्यानेच सोशल मीडियावर मला लक्ष्य केलं गेलं. आपल्या देशात आजही पुरूषी मानसिकता कायम आहे. सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य फक्त पुरूषांनाच दिलेलं आहे. जर मुलांना सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य मिळत तर मुलींना का मिळत नाही? असा सवाल तिने केला. सरकारी अधिकाऱ्याची मुलगी असल्याने ही लढाई लढणे सोपे जाईल असे वाटत होते. पण पाहिजे तितकी ही लढाई लढणे सोपे नाही. केवळ लोकांच्या पाठबळामुळेच मी ही लढाई लढण्याची हिंमत दाखवू शकले. विशेष म्हणजे मी कोण्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून मला पाठिंबा मिळालेला नाही. तर या घटनेनंतर मी लोकांच्या समोर आले आणि माझी ओळख लपविली नाही, त्यामुळेही लोक माझ्या पाठिशी उभे राहिले, असंही तिनं आवर्जून सांगितलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आल्याने आरोपींवर कारवाई होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवूनच मी पुढची लढाई लढत आहे, असंही तिने शेवटी स्पष्ट केलं.
भाजप नेत्याच्या मुलाकडून अपहरण करण्याचा आणि छेडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर घरात न बसता या प्रसंगाला सामोरे जाणाऱ्या धाडसी वर्णिका कुंडूचे देशभरातून कौतूक होत आहे. केवळ मार्शल आर्ट येत आल्यामुळेच या छेड काढणाऱ्यांशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास आल्याचं वर्णिकाने सांगितलं.
'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली. प्रत्येकासाठी सेल्फ डिफेन्स फार महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पोलीस आले आणि त्यांनी त्या मुलांना रोखलं. पण त्या आधी मी आत्मविश्वासाने या प्रसंगाला सामोरे गेले. भले मी मारामारी केली नसेल. पण मार्शल आर्टस शिकल्यामुळे मनात आत्मविश्वास निर्माण झालेला होता. त्यामुळे अशा प्रसंगांना सामोरे जाताना प्रतिकार करता आला. जर देशातील प्रत्येक मुलगी निडर झाली आणि तिने पुरूषांना घाबरणे बंद केले तर पुरूषही महिलांना घाबरवण्याचं बंद करतील, असं वर्णिकानं सांगितलं.
या प्रसंगानंतर लोकांनी, महिला संघटनांनी आणि माध्यमांनी मला खूप आधार दिला. पाठिंबा दिला. माझ्या जागी कोणत्याही मुलीवर हा प्रसंग आला असता तरी देशातील जनता तिच्या पाठिशी उभी राहिली असती, असं सांगतानाच आई-वडिलांनी कधीच आमच्यात स्त्री-पुरूष असा भेद केला नाही. त्यांनी नेहमीच समान वागणूक देत आम्हाला कोणतीही गोष्ट करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यांनी मुलगी म्हणून नव्हे तर माणूस म्हणून आम्हाला वाढविले, असेही ती म्हणाली.
मी केवळ मुलगी असल्यानेच सोशल मीडियावर मला लक्ष्य केलं गेलं. आपल्या देशात आजही पुरूषी मानसिकता कायम आहे. सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य फक्त पुरूषांनाच दिलेलं आहे. जर मुलांना सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य मिळत तर मुलींना का मिळत नाही? असा सवाल तिने केला. सरकारी अधिकाऱ्याची मुलगी असल्याने ही लढाई लढणे सोपे जाईल असे वाटत होते. पण पाहिजे तितकी ही लढाई लढणे सोपे नाही. केवळ लोकांच्या पाठबळामुळेच मी ही लढाई लढण्याची हिंमत दाखवू शकले. विशेष म्हणजे मी कोण्या सरकारी अधिकाऱ्याची मुलगी आहे म्हणून मला पाठिंबा मिळालेला नाही. तर या घटनेनंतर मी लोकांच्या समोर आले आणि माझी ओळख लपविली नाही, त्यामुळेही लोक माझ्या पाठिशी उभे राहिले, असंही तिनं आवर्जून सांगितलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आल्याने आरोपींवर कारवाई होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवूनच मी पुढची लढाई लढत आहे, असंही तिने शेवटी स्पष्ट केलं.