अ‍ॅपशहर

'मुंबई हल्ल्याचे सूत्रधार मोकाट ही चिंतेची बाब'

'मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील आरोपी आठ वर्षांनंतरही पाकिस्तानात मोकाट फिरत असतील तर ती चिंतेची बाब आहे', असे खडेबोल आज भारताने पाकिस्तानला सुनावले. मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांवर तत्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही भारताने केली.

Maharashtra Times 27 Apr 2017, 10:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 perpetrators enjoy freedom in pak india
'मुंबई हल्ल्याचे सूत्रधार मोकाट ही चिंतेची बाब'


'मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील आरोपी आठ वर्षांनंतरही पाकिस्तानात मोकाट फिरत असतील तर ती चिंतेची बाब आहे', असे खडेबोल आज भारताने पाकिस्तानला सुनावले. मुंबईवरील हल्ल्याच्या सूत्रधारांवर तत्काळ कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही भारताने केली.

मुंबई हल्ल्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. मात्र पाकने ही मागणी फेटाळली. तसेच मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदविरोधात ठोस पुरावे द्यावेत, हे जुनेच तुणतुणे वाजवले. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

'मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणारे आणि हा हल्ला करण्यात ज्यांचा प्रत्यक्ष हात आहे अशा पाकिस्तानातील सर्व आरोपींवर कारवाई करण्याची जबाबदारी पाक सरकारची आहे. या हल्ल्याला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही हे आरोपी पाकमध्ये मुक्तसंचार करत असतील आणि त्यांच्याविरोधात कोणताच गुन्हा दाखल होत नसेल तर ती चिंतेची बाब आहे', असे बागले म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज