अ‍ॅपशहर

अयोध्याप्रकरणी मौलाना नदवी यांचे घुमजाव

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभारले पाहिजे अशी भूमिका मांडणारे मौलाना सलमान नदवी यांनी अचानक घुमजाव केलं आहे. 'राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली पाहिजे, तेच योग्य आहे,' असं नदवी यांनी स्पष्ट केलं. नदवी यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2018, 11:54 am
लखनऊ: अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभारले पाहिजे अशी भूमिका मांडणारे मौलाना सलमान नदवी यांनी अचानक घुमजाव केलं आहे. 'राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली पाहिजे, तेच योग्य आहे,' असं नदवी यांनी स्पष्ट केलं. नदवी यांनी अचानक घेतलेल्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maulana salman nadvi disassociates from ram mandir issue
अयोध्याप्रकरणी मौलाना नदवी यांचे घुमजाव


गुरुवारी रात्री मौलाना नदवी यांनी लखनऊमध्ये अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अयोध्या प्रकरणात पडणार नसल्याचं स्पष्ट केलं. अयोध्या प्रकरणात आपण पक्षकार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 'राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा मुद्दा आम्ही आमच्या अजेंड्यातून काढून टाकला आहे. त्यामुळे या प्रकरणात जे पक्षकार आहेत त्यांनीच आता या त्यावर तोडगा काढावा,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. अयोध्याबाबतचं यापूर्वीचं आपलं वक्तव्य मीडियाने काटछाट करून दाखविल्याचा दावाही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज