अ‍ॅपशहर

ईशान्येला भूकंपाचा धक्का

​​ ईशान्य भारताला बुधवारी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर तो ५.९ मोजण्यात आला. या धक्क्याने जीवित वा वित्तहानीचे कोणतेही वृत्त नाही. सकाळी १ वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू इटानगरच्या आग्नेय दिशेस ४० किलोमीटर अंतरावर होता.

महाराष्ट्र टाइम्स 25 Apr 2019, 12:26 am
इटानगर/गुवाहाटी :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम earthwquake


ईशान्य भारताला बुधवारी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर तो ५.९ मोजण्यात आला. या धक्क्याने जीवित वा वित्तहानीचे कोणतेही वृत्त नाही. सकाळी १ वाजून ४५ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू इटानगरच्या आग्नेय दिशेस ४० किलोमीटर अंतरावर होता.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चौकशी केली. हिमालयीन पर्वतरांगामध्येही बुधवारी ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला. पहाटे ४.१५ वाजता झालेल्या भूकंपामुळे अरुणाचल प्रदेशजवळ असलेल्या निईंगची शहराच्या मेदोग गावालाही धक्का जाणवला. या धक्क्यांनी कोणतीही हानी झालेली नाही. तिबेटलाही या भूकंपाचा धक्का बसला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज