अ‍ॅपशहर

या गावात दसऱ्याच्या दिवशी शोक, घरांमध्ये चूलही पेटत नाही, कारण वाचून हैराण व्हाल...

Meerut Village Story: दसरा सण येताच या गावावर शोककळा, निराशा पसरते. या दिवशी घरांमध्ये चूल पेटत नाही. असत्यावर सत्याच्या विजय म्हणून दसऱ्याचा देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, मेरठच्या गागोल गावात दसऱ्याच्या दिवशी गावात भयाण शांतता असते.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 3:59 pm
मेरठ: भारतात सणांना मोठं विशेष महत्त्व आहे. येथे लोक सणांची आतुरतेने वाट पाहत असतात. सणासुदीचे दिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात, गोड-धोड करतात, नवीन कपडे घालतात आणि पूजा करतात. अशाच सणांपैकी एक सण म्हणजे दसरा. आज दसऱ्यानिमित्त संपूर्ण देशात आनंद साजरा केला जात आहे. पण, एक गाव असंही आहे जिथे दसऱ्याच्या नावाने गावात शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Meerut Village Story
एक असं गाव जिथे दसऱ्याच्या दिवशी असते भयाण शांतता


दसरा सण येताच या गावावर शोककळा, निराशा पसरते. या दिवशी घरांमध्ये चूल पेटत नाही. असत्यावर सत्याच्या विजय म्हणून दसऱ्याचा देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, मेरठच्या गागोल गावात दसऱ्याच्या दिवशी गावात भयाण शांतता असते. शेकडो वर्षांपासून या गावात दसरा साजरा केला जात नाही. यामागचे कारणही शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासात दडलेलं आहे.

हेही वाचा -महाराष्ट्रातील या गावात दसऱ्याला रावणाचं दहन नाही तर होते पूजा, ३०० वर्षांपासूनची परंपरा आजही अबाधित

मेरठपासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या गागोल गावात दसरा सणाचं नाव ऐकताच लोकांमध्ये घबराट पसरते. लोक दु:खी होतात. पण, असं का? यामागील नेमकं कारण काय?

हेही वाचा -माझ्या नातीला तुरुंगात टाका, आजीची मागणी, सहा महिन्यांचं बाळ पाहून पोलीस अवाक

दसरा साजरा न करण्याचं कारण

गगोल गावात दसरा साजरा न करण्यामागील कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इथल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मेरठमध्ये क्रांतीची ज्योत पेटली तेव्हा या गावातील सुमारे नऊ क्रांतीकाऱ्यांना दसऱ्याच्या दिवशीच फाशी देण्यात आली होती. १८५७ मध्ये या ९ जणांना फाशी देण्यात आली होती. ते पिंपळाचं झाड आजही गावात आहेत, जिथे या गावातील नऊ लोकांना फाशी देण्यात आली होती. ही गोष्ट या गावातील मुलांमध्ये इतकी रुजली आहे की, लहान मूल असो वा ज्येष्ठ, पुरुष असो की महिला इथे कोणीही दसरा साजरा करत नाही. एवढंच नाही तर या दिवशी गावातील कोणत्याही घरात चूलही पेटत नाही. येथे लोक शहिदांना अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करतात.

हेही वाचा -सहा वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, आता पतीकडून तिरस्कार, महिला बँक अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल...
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख