शिलाँग: मेघालय विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असले तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सत्तेची चावी एनपीपीच्या हातात आल्याने सत्तेची गणितं जमविण्यासाठी काँग्रेस नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. गोव्याप्रमाणे मेघालयात भाजपकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना तातडीने मेघालयात पाठविले आहे. त्यामुळे मेघालयात सरकार स्थापन करण्यात काँग्रेसला यशस्वी होतेय का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून त्यात काँग्रेस आघाडीवर असली तरी काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला नाही. ५९ सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभेत काँग्रेस २८, एनपीपी १३ आणि भाजप ८ जागांवर आघाडीवर आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला तीन जागांची आवश्यकता आहे. अजूनही मतमोजणी सुरू असली तरी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना तातडीने मेघालयात पाठविले असून सत्ता स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पटेल यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी दोन बडे नेतेही मेघालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे मेघालयात काँग्रेस एनपीपीबरोबर आघाडी करण्याची शक्यता बळावली आहे.
मेघालयात गेल्या ९ वर्षांपासून काँग्रेसचे सरकार आहे. त्यातच जनतेने काँग्रेसलाच पुन्हा कौल दिल्याने काँग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, दिवंगत नेते पी. ए.संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सोबत भाजपनेही चर्चा सुरू केली असून एनपीपीला आघाडी करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यातच मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तिन्ही राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपने केल्याने मेघालयातील राजकीय घडामोडींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.
मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून त्यात काँग्रेस आघाडीवर असली तरी काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला नाही. ५९ सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभेत काँग्रेस २८, एनपीपी १३ आणि भाजप ८ जागांवर आघाडीवर आहे. सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला तीन जागांची आवश्यकता आहे. अजूनही मतमोजणी सुरू असली तरी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना तातडीने मेघालयात पाठविले असून सत्ता स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पटेल यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी दोन बडे नेतेही मेघालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे मेघालयात काँग्रेस एनपीपीबरोबर आघाडी करण्याची शक्यता बळावली आहे.
मेघालयात गेल्या ९ वर्षांपासून काँग्रेसचे सरकार आहे. त्यातच जनतेने काँग्रेसलाच पुन्हा कौल दिल्याने काँग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, दिवंगत नेते पी. ए.संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सोबत भाजपनेही चर्चा सुरू केली असून एनपीपीला आघाडी करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यातच मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या तिन्ही राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा भाजपने केल्याने मेघालयातील राजकीय घडामोडींकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.