अ‍ॅपशहर

'मोदीच काश्मीर समस्या सोडवू शकतात'

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. मोदी लाहोरला गेले यातून त्यांची हिंमत दिसून येते, असे गौरवोद्गार काढतानाच आम्हाला या दलदलीतून केवळ मोदीच बाहेर काढू शकतात आणि तेच काश्मीर समस्येवर तोडगा काढू शकतात, अशी आशाही मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

Maharashtra Times 6 May 2017, 2:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mehbooba mufti praise pm modi for his work
'मोदीच काश्मीर समस्या सोडवू शकतात'


जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. मोदी लाहोरला गेले यातून त्यांची हिंमत दिसून येते, असे गौरवोद्गार काढतानाच आम्हाला या दलदलीतून केवळ मोदीच बाहेर काढू शकतात आणि तेच काश्मीर समस्येवर तोडगा काढू शकतात, अशी आशाही मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. काश्मीर समस्या सोडविण्यासाठी काश्मीर त्यांना संपूर्ण सहकार्य करेल असेही त्यांनी स्पष्ट केलं.

जम्मूमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे गौरवोद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना संपूर्ण काश्मीर पाठिंबा देईल, असे सांगतानाच पूर्वीही अनेक पंतप्रधानांना पाकिस्तानात जायचे होते. पण त्यांची हिंम्मत झाली नाही. मोदी मात्र पाकिस्तानात गेले. त्यांच्या या हिंमतीला दाद द्यावीच लागेल, असे त्या म्हणाल्या. काश्मीरची स्थिती चांगली नाही. त्याचा परिणाम जम्मूवरही होत असतो. पण जम्मूत अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे तिथे पर्यटक येण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज