अ‍ॅपशहर

'मोदी सरकारच्या गर्वामुळेच देश आर्थिक संकटात'; विरोधक एकवटले

MPs Suspension : राज्यसभेत विरोधी पक्षाच्या आठ खासदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षानं मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय. काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर 'एकाधिकारशाही'चा आरोप केलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2020, 3:19 pm
नवी दिल्ली : कृषि विषयक विधेयकांमुळे राज्यसभेत झालेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षाच्या आठ खासदारांना निलंबित करण्यात आलंय. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या खासदारांना निलंबित करण्यात येत असल्याचं आज संसदेत म्हटलं. यावरून सरकारकडून गळचेप्या भूमिकेचा विरोधकांकडून निषेध करण्यात आलाय. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बेलगाम असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात सत्ताधारी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलंय. सरकारच्या गर्वामुळेच संपूर्ण देश आज आर्थिक संकटात सापडल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम राहुल गांधी - ममता बॅनर्जी
राहुल गांधी - ममता बॅनर्जी




वाचा : योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कफील खान 'संयुक्त राष्ट्रा'त
वाचा : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई

राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून ही टीका केली. 'लोकशाहीवादी भारतात आवाज दाबण्याचा प्रयत्न : सुरुवातीला गप्प करण्यात आलं आणि नंतर काळ्या कृषि कायद्यांवरून शेतकऱ्यांच्या चिंतांना बाजुला सारत खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या सर्वज्ञ सरकारच्या कधीही न संपणाऱ्या गर्वामुळेच संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडलाय' असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही खासदारांच्या निलंबनावरून मोदी सरकारवर ताशेरे ओढलेत. 'शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या आठ खासदारांचं निलंबन दुर्दैवी आहे. या बेलगाम, निरंकुश सरकारच्या विचारसणीचाच हे उदाहरण आहे. हे सरकार लोकशाही नियमांचं आणि सिद्धांताचा सन्मान करत नाही. पण आम्ही झुकणार नाही. या फॅसिस्ट सरकारशी आम्ही संसदेत आणि रस्त्यावरही लढणार' असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं.


दरम्यान, आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आठव्या दिवशी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधी पक्षाच्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केलीय. रविवारी राज्यसभेत गोंधळ घालताना धक्काबुक्की करण्यासाठी आणि नियम पुस्तिका फाडण्यासाठी या खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. यावरून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपसभापतींना त्यांना सदनाच्या बाहेर जाण्यास सांगितलं मात्र त्यांनी यास नकार दिला. गोंधळ वाढल्यामुळे सभागृहाचं कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आलं.



वाचा : गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रधान मोदी म्हणतात...
वाचा :दिलासा : नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज