नवी दिल्ली:
अभिनेते नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्यापाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप लागल्याने बॉलिवूडपाठोपाठ राजकीय क्षेत्रही ढवळून निघाले आहे. भाजपचे खासदार उदित राज यांनी तर दोन-चार लाख रुपयांसाठी या महिला पुरुषांवर आरोप करत असल्याचं विधान करत #MeToo मोहिमेवरच शंका उपस्थित केली आहे. उदित राज यांच्या या धक्कादायक विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. #MeToo मोहीम केवळ ब्लॅकमेलिंगसाठीच असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उदित राज यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 'काही महिला जाणूनबुजून पुरुषांवर आरोप करत आहेत. आरोप करून दोन-चार लाख रुपये वसूल केल्यावर या महिला पुन्हा दुसऱ्या पुरुषांना टार्गेट करतात', असं धक्कादायक विधान उदित राज यांनी केलं. 'हा पुरुषांचा स्वभावच आहे. हे मान्य आहे. पण म्हणून काय महिला परफेक्ट आहेत काय? त्याही या गोष्टींचा दुरुपयोग करत नाहीत का? काही स्त्रियांच्या या प्रकारामुळे पुरुषांचं आयुष्य बर्बाद होऊ लागलं आहे', असंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वी उदित राज यांनी #MeToo मोहिमेवर टीका केली होती. ही मोहीम चुकीची असून त्यामुळे चुकीची प्रथा पडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. बऱ्याच वर्षानंतरची गोष्ट आता उजेडात आणल्यावर त्याच्या सत्यतेची चौकशी कशी होणार? खोट्या आरोपांमुळे एखाद्याची प्रतिमाही मलिन होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. #MeToo मोहिमेचा उपयोग ब्लॅकमेलिंगसाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
'लव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहत असलेल्या एखाद्या मुलीने आपल्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करावा आणि तो तुरुंगात जावा, हे कसं होऊ शकतं? अशा प्रकारच्या घटना रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी बाबतीत घडत आहेत. ब्लॅकमेलिंगसाठीच या गोष्टी घडत नाहीत का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
अभिनेते नाना पाटेकर, आलोकनाथ यांच्यापाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप लागल्याने बॉलिवूडपाठोपाठ राजकीय क्षेत्रही ढवळून निघाले आहे. भाजपचे खासदार उदित राज यांनी तर दोन-चार लाख रुपयांसाठी या महिला पुरुषांवर आरोप करत असल्याचं विधान करत #MeToo मोहिमेवरच शंका उपस्थित केली आहे. उदित राज यांच्या या धक्कादायक विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. #MeToo मोहीम केवळ ब्लॅकमेलिंगसाठीच असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उदित राज यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. 'काही महिला जाणूनबुजून पुरुषांवर आरोप करत आहेत. आरोप करून दोन-चार लाख रुपये वसूल केल्यावर या महिला पुन्हा दुसऱ्या पुरुषांना टार्गेट करतात', असं धक्कादायक विधान उदित राज यांनी केलं. 'हा पुरुषांचा स्वभावच आहे. हे मान्य आहे. पण म्हणून काय महिला परफेक्ट आहेत काय? त्याही या गोष्टींचा दुरुपयोग करत नाहीत का? काही स्त्रियांच्या या प्रकारामुळे पुरुषांचं आयुष्य बर्बाद होऊ लागलं आहे', असंही त्यांनी सांगितलं.
यापूर्वी उदित राज यांनी #MeToo मोहिमेवर टीका केली होती. ही मोहीम चुकीची असून त्यामुळे चुकीची प्रथा पडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. बऱ्याच वर्षानंतरची गोष्ट आता उजेडात आणल्यावर त्याच्या सत्यतेची चौकशी कशी होणार? खोट्या आरोपांमुळे एखाद्याची प्रतिमाही मलिन होऊ शकते, असं त्यांनी म्हटलं होतं. #MeToo मोहिमेचा उपयोग ब्लॅकमेलिंगसाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
'लव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहत असलेल्या एखाद्या मुलीने आपल्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करावा आणि तो तुरुंगात जावा, हे कसं होऊ शकतं? अशा प्रकारच्या घटना रोज कुणाच्या ना कुणाच्या तरी बाबतीत घडत आहेत. ब्लॅकमेलिंगसाठीच या गोष्टी घडत नाहीत का?, असा सवालही त्यांनी केला आहे.