हैदराबाद: एनआरसी प्रक्रिया देशभरात सर्वत्र लागू करण्यात येईल, असं काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं असतानाच, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. 'खोदा पहाड़ निकला चूहा'...आता भाजप एनआरसी हटवण्याचा प्रयत्न करत आहे, असं ट्विट त्यांनी केलं.
एनआरसी मसुद्यावरून वादविवाद सुरू असतानाच, असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. 'खोदा पहाड़ निकला चूहा...आता एनआरसी हटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदी हे पुन्हा संपूर्ण देशाला रांगेत उभे करू पाहत आहेत,' असं ट्विट ओवेसी यांनी केलं. मोदी पुन्हा एका देशाला रांगेत उभे करू पाहत आहेत आणि त्यांना कागदपत्रे नसलेल्या भारतीयांना ताब्यात घ्यायचं आहे. त्यातील अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकांना नोकरशहांच्या दयेवर सोडायचा डाव आहे. जगात कुठेही लोक अशा पद्धतीच्या अडचणींतून जात नाहीत, असं ओवेसी म्हणाले.
एनआरसी हटवण्याची आसाम सरकारची मागणी
देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत दिल्यानंतर, लगेच आसाम सरकारनं एनआरसी यादी रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनं अलीकडेच एनआरसी रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. लागू करण्यात आलेल्या एनआरसी मसुद्यात अनेक उणिवा आहेत, असं आसामचे अर्थमंत्री हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले.
'एनआरसी'मुळं घाबरण्याचं कारण नाही....
'एनआरसी'मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. अन्य धर्माच्या लोकांना यादीत स्थान दिलं जाणार नाही, अशी कोणतीही तरतूद एनआरसीमध्ये नाही. सर्व नागरिक, मग त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांना या यादीत स्थान दिलं जाऊ शकतं. एनआरसी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक ही वेगळी प्रक्रिया आहे,' असं अमित शहा यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं होतं. देशातील सर्व नागरिकांना एनआरसी यादीत स्थान मिळावं यासाठी ते संपूर्ण देशात लागू केले जाणार आहे, असंही ते म्हणाले होते.
एनआरसी मसुद्यावरून वादविवाद सुरू असतानाच, असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. 'खोदा पहाड़ निकला चूहा...आता एनआरसी हटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मोदी हे पुन्हा संपूर्ण देशाला रांगेत उभे करू पाहत आहेत,' असं ट्विट ओवेसी यांनी केलं. मोदी पुन्हा एका देशाला रांगेत उभे करू पाहत आहेत आणि त्यांना कागदपत्रे नसलेल्या भारतीयांना ताब्यात घ्यायचं आहे. त्यातील अल्पसंख्याक आणि दुर्बल घटकांना नोकरशहांच्या दयेवर सोडायचा डाव आहे. जगात कुठेही लोक अशा पद्धतीच्या अडचणींतून जात नाहीत, असं ओवेसी म्हणाले.
एनआरसी हटवण्याची आसाम सरकारची मागणी
देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत दिल्यानंतर, लगेच आसाम सरकारनं एनआरसी यादी रद्द करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारनं अलीकडेच एनआरसी रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. लागू करण्यात आलेल्या एनआरसी मसुद्यात अनेक उणिवा आहेत, असं आसामचे अर्थमंत्री हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले.
'एनआरसी'मुळं घाबरण्याचं कारण नाही....
'एनआरसी'मध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. अन्य धर्माच्या लोकांना यादीत स्थान दिलं जाणार नाही, अशी कोणतीही तरतूद एनआरसीमध्ये नाही. सर्व नागरिक, मग त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांना या यादीत स्थान दिलं जाऊ शकतं. एनआरसी ही स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक ही वेगळी प्रक्रिया आहे,' असं अमित शहा यांनी काल राज्यसभेत स्पष्ट केलं होतं. देशातील सर्व नागरिकांना एनआरसी यादीत स्थान मिळावं यासाठी ते संपूर्ण देशात लागू केले जाणार आहे, असंही ते म्हणाले होते.