अ‍ॅपशहर

Mob Lynching: 'हा मोदींविरोधात कट'

'देशात वेगवेगळ्या ठिकाणी जमावाकडून होणारे सामूहिक हल्ले (मॉब लिंचिंग) व हत्या हा मोदी सरकारविरोधातील व्यापक कटाचा भाग आहे. नरेंद्र मोदी जितके लोकप्रिय होत जातील, तितकी अशा घटनांमध्ये वाढ होत जाईल,' असा दावा केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jul 2018, 2:14 pm
जयपूर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mob lynching the more popular modi ji becomesthe more such incidents will happen
Mob Lynching: 'हा मोदींविरोधात कट'


'देशात वेगवेगळ्या ठिकाणी जमावाकडून होणारे सामूहिक हल्ले व हत्या हा मोदी सरकारविरोधातील व्यापक कटाचा भाग आहे. नरेंद्र मोदी जितके लोकप्रिय होत जातील, तितकी अशा घटनांमध्ये वाढ होत जाईल,' असा दावा केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी केला आहे.

राजस्थानातील अल्वर येथे शुक्रवारी रात्री अकबर खान या तरुणाची गो तस्करीच्या संशयावरून निर्घृण हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मेघवाल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांचा आम्ही निषेधच करतो. मात्र, ही काही पहिलीच घटना नाही. याचं मूळ आपल्याला इतिहासात शोधायला हवं. या घटना का घडताहेत, त्या थांबवण्याची जबाबदारी कोणाची,' असा सवाल करतानाच, '१९८४साली शीख समुदायाविरोधात जे काही झालं, ते देशाच्या इतिहासातील सर्वात मोठं सामूहिक हत्याकांड होतं,' असं मेघवाल म्हणाले.

मेघवाल यांनी या हत्यांचा संबंध मोदी सरकारच्या कारभाराशी जोडला. 'मोदी जसजसे लोकप्रिय होती, तसतशा अशा हिंसक घटना वाढत जातील. बिहार निवडणुकीच्या वेळी 'पुरस्कार वापसी' झाली. यूपी निवडणुकीच्या वेळी सामूहिक हल्ल्यांनी वातावरण तापवलं गेलं. २०१९ साली आणखी काही असेल. पंतप्रधान मोदी यांनी नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. त्याचा परिणाम दिसू लागलाय. त्याची ही प्रतिक्रिया आहे,' असंही मेघवाल म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज