मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
अणु पुरवठादार देशाच्या (एनएसजी) गटात भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून या मार्गातील चीनचा अडथळा ओलांडण्यासाठी मोदींनी भारताचा जुना मित्र रशियाला साद घातली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून याबाबत चर्चा केली.
जगातील ४८ देशांचा समावेश असलेल्या 'एनएसजी'मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारत प्रयत्नशील आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर भारतानं आक्रमकपणे याचा पाठपुरावा सुरू केला आहे. अमेरिकेच्या नि:संदिग्ध पाठिंब्यामुळं त्यास बरंच यश मिळालं असलं तरी आशिया खंडातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेला चीन भारताच्या या प्रयत्नात खोडा घालत आहे. भारताला एनएसजीपासून किमान एक वर्ष दूर ठेवायचे, असा चीनचा प्रयत्न आहे. तो हाणून पाडण्यासाठी मोदी यांनी शनिवारी पुतीन यांना फोन केला आणि सहकार्याची विनंती केली. रशियन सरकारनंच याबाबत माहिती दिली आहे. 'मोदी व पुतीन यांच्यात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचं रशियानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
जागतिक राजकारणात रशिया नेहमीच भारताला पाठिंबा देत आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठीही रशियाचा भारताला पाठिंबा आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला आहे. मात्र, त्यानंतरही रशियाच्या भूमिकेत फारसा बदल झालेला नाही.
अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केल्याशिवाय कोणत्याही देशाला एनएसजीत स्थान देण्यात चीनचा विरोध आहे. तसं करायचं असल्यास एनएसजीच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत व्हायला हवं अशी चीनची भूमिका आहे. पाकिस्तानशी उत्तम संबंध ठेवून असणाऱ्या तुर्कीचाही भारताच्या प्रवेशाला विरोध आहे. भारताला प्रवेश द्यायचा असल्यास पाकिस्तानलाही द्यावा, अशी तुर्कीची भूमिका आहे.
अणु पुरवठादार देशाच्या (एनएसजी) गटात भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून या मार्गातील चीनचा अडथळा ओलांडण्यासाठी मोदींनी भारताचा जुना मित्र रशियाला साद घातली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून याबाबत चर्चा केली.
जगातील ४८ देशांचा समावेश असलेल्या 'एनएसजी'मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भारत प्रयत्नशील आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर भारतानं आक्रमकपणे याचा पाठपुरावा सुरू केला आहे. अमेरिकेच्या नि:संदिग्ध पाठिंब्यामुळं त्यास बरंच यश मिळालं असलं तरी आशिया खंडातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेला चीन भारताच्या या प्रयत्नात खोडा घालत आहे. भारताला एनएसजीपासून किमान एक वर्ष दूर ठेवायचे, असा चीनचा प्रयत्न आहे. तो हाणून पाडण्यासाठी मोदी यांनी शनिवारी पुतीन यांना फोन केला आणि सहकार्याची विनंती केली. रशियन सरकारनंच याबाबत माहिती दिली आहे. 'मोदी व पुतीन यांच्यात द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचं रशियानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
जागतिक राजकारणात रशिया नेहमीच भारताला पाठिंबा देत आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्वासाठीही रशियाचा भारताला पाठिंबा आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला आहे. मात्र, त्यानंतरही रशियाच्या भूमिकेत फारसा बदल झालेला नाही.
अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी केल्याशिवाय कोणत्याही देशाला एनएसजीत स्थान देण्यात चीनचा विरोध आहे. तसं करायचं असल्यास एनएसजीच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत व्हायला हवं अशी चीनची भूमिका आहे. पाकिस्तानशी उत्तम संबंध ठेवून असणाऱ्या तुर्कीचाही भारताच्या प्रवेशाला विरोध आहे. भारताला प्रवेश द्यायचा असल्यास पाकिस्तानलाही द्यावा, अशी तुर्कीची भूमिका आहे.