ओडिशा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरीविरोधी आहेत. ते अन्नदात्यांना प्रतिदिन अवघे ३.५० रुपये देत आहेत, तर उद्योगपतींना ३.५ लाख कोटी रुपये माफ करत आहेत. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देणं म्हणजे त्यांची थट्टा करण्यासारखंच आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
राफेल करारावरूनदेखील राहुल गांधींनी पुन्हा एकवार सरकारवर हल्लाबोल केला. 'एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार मोदींनी स्वत: राफेल करार तयार केला आणि संपूर्ण करार करवून घेतला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. ऐवजी अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला,' असं राहुल म्हणाले.
दक्षिण ओडिशात कोरापूट जिल्ह्यात जयपूरमध्ये एका जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. येथील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होती. याच जिल्ह्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.चे एक युनिटही आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरीविरोधी आहेत. ते अन्नदात्यांना प्रतिदिन अवघे ३.५० रुपये देत आहेत, तर उद्योगपतींना ३.५ लाख कोटी रुपये माफ करत आहेत. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देणं म्हणजे त्यांची थट्टा करण्यासारखंच आहे, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
राफेल करारावरूनदेखील राहुल गांधींनी पुन्हा एकवार सरकारवर हल्लाबोल केला. 'एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार मोदींनी स्वत: राफेल करार तयार केला आणि संपूर्ण करार करवून घेतला. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. ऐवजी अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला,' असं राहुल म्हणाले.
दक्षिण ओडिशात कोरापूट जिल्ह्यात जयपूरमध्ये एका जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. येथील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा होती. याच जिल्ह्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.चे एक युनिटही आहे.