नवी दिल्ली: जागतिक वारसास्थळ असलेल्या दिल्लीच्या कुतूब मिनारमध्ये (Qutub Minar) गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या दोन गणेशमूर्ती लवकरच इतरत्र स्थलांतरित केल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA) यासंदर्भात भारतीय पुरातत्व खात्याला पत्र पाठवले आहे. या गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी केली आहे. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने पुरातत्व खात्याला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, गणेश मूर्तींना कुतूब मिनारमध्ये सध्याच्या अवस्थेत राहून देणे, हे अवमानजनक आहे. त्यामुळे या गणेश मूर्तींना राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात यावे. जेणेकरून त्यांचा मान अबाधित राहील. या प्राचीन मूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात ठेवल्या जाऊ शकतात. कुतूब मिनारमधील मशिदीत लोक प्रवेश करतात तेव्हा गणेशमूर्ती त्यांच्या पायांच्या उंचीवर असते. मी या ठिकाणाला अनेकदा भेट दिली असून, तेथे मूर्ती ठेवल्या जाणे हे त्या मूर्तीबाबत अवमानकारक असल्याचे मला जाणवल्याचे तरुण विजय यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता पुरातत्व खाते यासंदर्भात कार्यवाही करणार का, हे पाहावे लागेल. तसेच अनेक दशकांपासून कुतूब मिनारमध्ये असलेल्या या गणेशमूर्ती हटवण्यात आल्यास त्याचे काही पडसाद उमटणार का, याकडेही साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
युनोस्कोने १९९३ साली कुतूब मिनारला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देऊ केला होता. कुतूब मिनार परिसरात असणाऱ्या या गणेशमूर्तींना अनुक्रमे 'उल्टा गणेश', 'पिंजरे मे गणेश'अशा नावांनी संबोधले जाते. यापैकी एक मूर्ती कुव्वत उल इस्लाम मशिदीच्या दक्षिणेच्या भिंतीवर आहे. तर 'पिंजरे मे गणेश' हे मूर्ती याच मशिदीचा भाग असून जमिनीला अगदी लागून आहे. त्यामुळे लोक जेव्हा मशिदीत प्रवेश करतात तेव्हा ही मूर्ती अगदी त्यांच्या पायाजवळ असते. याच गोष्टीवर राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या प्रमुखांनी आक्षेप घेतला आहे. बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनारची निर्मिती केली. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांना अंशत: नष्ट करून तेथे नवी वास्तू उभारल्याची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे.
युनोस्कोने १९९३ साली कुतूब मिनारला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देऊ केला होता. कुतूब मिनार परिसरात असणाऱ्या या गणेशमूर्तींना अनुक्रमे 'उल्टा गणेश', 'पिंजरे मे गणेश'अशा नावांनी संबोधले जाते. यापैकी एक मूर्ती कुव्वत उल इस्लाम मशिदीच्या दक्षिणेच्या भिंतीवर आहे. तर 'पिंजरे मे गणेश' हे मूर्ती याच मशिदीचा भाग असून जमिनीला अगदी लागून आहे. त्यामुळे लोक जेव्हा मशिदीत प्रवेश करतात तेव्हा ही मूर्ती अगदी त्यांच्या पायाजवळ असते. याच गोष्टीवर राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाच्या प्रमुखांनी आक्षेप घेतला आहे. बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनारची निर्मिती केली. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांना अंशत: नष्ट करून तेथे नवी वास्तू उभारल्याची नोंद इतिहासात आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे.