अ‍ॅपशहर

मोदींना जगाचे पंतप्रधान करा!: लालूंची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीमुळं जगाच्या राजकारणात भारताचं वजन वाढत असताना इकडं देशात विरोधकांकडून मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांची खिल्ली उडवली जात आहे. शिवसेना व काँग्रेसनंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी यावर टीप्पणी केली आहे. 'नरेंद्र मोदी हे अनिवासी भारतीय (एनआरआय) झाले आहेत. त्यांना जगाचे पंतप्रधान बनवा,' असं लालूंनी म्हटलंय.

Maharashtra Times 13 Jun 2016, 3:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi has become nri should become world pm says lalu prasad
मोदींना जगाचे पंतप्रधान करा!: लालूंची टीका


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीमुळं जगाच्या राजकारणात भारताचं वजन वाढत असताना इकडं देशात विरोधकांकडून मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांची खिल्ली उडवली जात आहे. शिवसेना व काँग्रेसनंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी यावर टीप्पणी केली आहे. 'नरेंद्र मोदी हे अनिवासी भारतीय (एनआरआय) झाले आहेत. त्यांना जगाचे पंतप्रधान बनवा,' असं लालूंनी म्हटलंय.

तब्बल ३०० कोटींच्या चारा घोटाळ्यात दोषी ठरलेल्या व एक वर्षाचा तुरुंगवास भोगलेल्या लालूंना आज याच प्रकरणात सीबीआय न्यायालयापुढं हजर राहावं लागणार आहे. त्यासाठी रांची येथे आले असता त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. 'मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. पण ते जास्त वेळ देशाबाहेरच असतात. त्यामुळं जगातील तमाम नेत्यांनी मोदींसाठी 'जगाचे पंतप्रधान' म्हणून एक पद निर्माण करावं आणि त्यावर त्यांना बसवावं. ते त्या पदासाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहेत,' असं टोला लालूंनी हाणला.

नीलगायींच्या हत्येच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. 'एकीकडं भाजप गोरक्षणाच्या गोष्टी करतं आणि दुसरीकडं नीलगायींना मारण्याचे आदेश देतं. असं करून भाजप सामाजिक तेढ निर्माण करतोय, असा आरोपही लालूंनी केला. 'नीलगायींच्या हत्येशी बिहार सरकारचा संबंध नाही. केंद्र सरकारनं त्यासाठी हैदराबादहून शूटर पाठवले होते,' असंही लालू म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज